शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ल्यात मेजर आणि एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 7:54 AM

जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसहीत 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

श्रीनगर, दि. 3 -  जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसहीत 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 दहशतवाद्यांनी सैन्याच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर संपूर्ण परिसरात सैन्यानं शोधमोहीम सुरू केली. 

तर दुसरीकडे, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील गोपालपोरा परिसरात गुरुवारी सकाळी जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुधवारी रात्री संशयित दहशतवादी परिसरात शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस संयुक्त शोध मोहीम सुरू केली व शोपियान जिल्ह्यातील सुगान गावाला घेराव घातला. 

दरम्यान, मंगळवारी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात. 

भारतीय लष्कराकडून 114 दहशतवाद्यांचा खात्माअबू दुजानासहीत दहशतवादी आरिफ लिहारी याचाही मंगळवारी जवानांनी खात्मा केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफ लिहारीचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 वा होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते.

 

विशेष म्हणजे फक्त जुलै महिन्यात जवळपास 22 दहशतवादी ठार झाले आहेत. 2 जुलैपर्यंत एकूण 92 दहशतवादी ठार होते, 31 जुलैपर्यंत हा आकडा 114 वर पोहोचला. 2012 आणि 2013 मधील आकडेवारी पाहता 2017 मधील आकडा खूपच वाढला आहे. 2012 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 72 आणि 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर आकडेवारीमध्ये सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवादी ठार झाले होते. 'दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मोकळे हात दिले असून तसेच राजकीय पाठिंबा मिळत असल्याने सुरक्षा जवानांना गतवर्षी असलेला 150 चा आकडा पार करण्यात यश मिळेल', असे गृहमंत्रालयाशी संबंधित एका अधिका-याने सांगितले आहे. 

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबू दुजाना आणि त्याच्या साथीदाराचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगले यश मिळत आहे. सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार काश्मीरसंबंधी मुख्य तीन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, ज्यामध्ये जर का दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास नकार देत असेल तर त्यांना ठार करण्यात येत आहे. चकमक होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांकडून निदर्शन होत असलं तरी त्याचा काहीच प्रभाव सुरक्षा जवानांवर होत नाही. सोबतच टेरर फंडिंगशी संबंधित हुर्रियत फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, स्थानिक लोकांसोबत शक्य तितकी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल ज्यामुळे त्यांना आपण पीडित असल्याचं भासू नये. येणा-या दिवसांमध्ये सुरक्षा जवान आपली ही भूमिका कायम ठेवतील असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे दहशतवाद्यांवरील दबाव अजून वाढेल. याशिवाय अन्य मोठे दहशतवादी ज्यामध्ये अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांचा समावेश आहे, त्यांना ठार करण्यासाठी लष्कराकडे प्लान तयार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्थानिक सूत्रांकडून मिळणारी माहिती आणि सुरक्षा जवानांमध्ये होणारा योग्य सुसंवाद यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारला आहे.