Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:38 PM2019-08-06T15:38:24+5:302019-08-06T15:42:05+5:30

कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या भूमिकेला आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही पाठिंबा दिला.

Jammu and Kashmir Poll: Do you agree with Congress allegation on bjp after they scrapped Article 370 | Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

Next

जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी जाहीर केला. गेली सात दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त कलमं सरकारने रद्द केली. तसंच, जम्मू-काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येईल, असं जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं, विभाजनाचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं बहुतांश जनता स्वागत करतेय. आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही मोदी सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. याउलट, काँग्रेसनं कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेला विरोध केला आहे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वालाच भाजपाने नख लावले असून हे कृत्य घटनाविरोधी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल दिली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. 

काँग्रेसची ही भूमिका तुम्हाला पटते का?, की मोदी सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? नोंदवा आपलं मत...

'कलम 370' रद्द करताना मोदी सरकारने घटनेच्या मुळावरच घाव घातला, हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

होय. सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं होतं! (352 votes)
नाही. जनभावना ओळखून घेतलेला निर्णय! (2139 votes)

Total Votes: 2491

Web Title: Jammu and Kashmir Poll: Do you agree with Congress allegation on bjp after they scrapped Article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.