शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 11:14 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहे

नवी दिल्ली - कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. या प्रकरणावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

पत्रकारांनी गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहे असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. 

बुधवारपासून अजित डोवाल काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील सामान्य माणसांच्या भेटीगाठी करत आहे. काही ठिकाणी ते सामान्यांसोबत जेवतानादेखील दिसत आहे. कलम 370 हटवल्यानंतर डोवाल काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते लोकांसोबत जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवान यांचीही भेट घेत आहेत. 

कलम 370 हटवल्याच्या विवादानंतर गुलाम नबी आझाद आज श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात ते कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य आहे. तर काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. 

जम्मू काश्मीरमधील स्थिती सध्या तणावग्रस्त आहे. फुटिरतावादी नेत्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या कारणास्तव खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी जवान तैनात आहेत. गुरुवारी सकाळी येथील बाजारपेठा उघडण्यात आल्या. जम्मूतील लोकं दैनदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरुन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

  

टॅग्स :Ajit Dovalअजित डोवालcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370