शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जय श्रीराम अन् टाळ्यांचा कडकडाट...; राष्ट्रपतींना मधेच थांबवावं लागलं भाषण, संसदेत नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:53 IST

...अन् सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.

संसदेच्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात राम मंदिराचा उल्लेख केला आणि संपूर्ण सभागृह टाळ्या आणि जय श्रीरामच्या घोषणेने दणाणून गेले. राष्ट्रपती मुर्मू यांनी, राम मंदिराची इच्छा आता पूर्ण झाली आहे, असे म्हणताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक वाजवायला सुरुवात केली. यानंतर सभागृहात सदस्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रतींना आपले भाषणही मधेच थांबवावे लागले.  

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, गेल्या शेकडो वर्षांपासून राम मंदिराची इच्छा होती. आज ते साकार झाले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 संदर्भातील शंका आज इतिहास झाल्या आहेत. तीन तलाक संदर्भात कडक कायदा तयार करण्यात आला आहे. 

भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला -राष्ट्रपती म्हणाल्या, "पूर्वी पूर्णपणे कोलमडलेली बँकिंग व्यवस्था आज जगातील सर्वात मजबूत व्यवस्था बनली आहे. पूर्वी डबल डिजिट असलेला NPA आता केवळ 4 टक्के राहिला आहे. काही वर्षांपूर्वी भारत खेळणी आयात करायचा, मात्र आज मेड इन इंडिया खेळणी निर्यात करत आहे. भारताच्या संरक्षण प्रकल्पाने एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तेजस हे लढाऊ विमान आता आपल्या हवाई दलाची ताकद बनत आहे."

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील काही महत्वाचे मुद्दे -- युवाशक्ती, महिला शक्ती, शेतकरी आणि गरीब या चार अत्यंत महत्त्वाच्या चार स्तंभांच्या बळावर हा देश उभा आहे. १० कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. ११ कोटी ग्रामस्थांपर्यंत पाईपने पाणी पोहोचले आहे. 

- कोरोनाच्या काळात ८० कोटी देशवासीयांना मोफत रेशन दिले. आता येत्या ५ वर्षांसाठी ही योजना वाढवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबरपासून विकास भारत संपर्क यात्रा सुरू असून आतापर्यंत सुमारे १९ कोटी देशबांधव या यात्रेत सहभागी झाले आहेत. 

- गेल्या दोन वर्षांत जगाने दोन युद्धे आणि कोरोनासारखी महामारी पाहिली आहे. असे असतानाही केंद्र सरकारने देशातील महागाई नियंत्रणात ठेवली. सर्वसामान्य भारतीयांवर बोजा वाढू दिला नाही. २०१४ पूर्वी १० वर्षांत सरासरी महागाई दर ८ टक्क्यांहून अधिक होता. परंतु, गेल्या दशकांतील सरासरी चलनवाढ ५ टक्के राहिली. 

- पूर्वी देशवासीयांच्या २ लाखांच्या उत्पन्नावर कर आकारला जात होता. आज भारतात ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. केंद्र सरकारने शेतीचा खर्च कमी करून नफा वाढवला आहे. पहिल्यांदाच देशातील कृषी आराखड्यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांना महत्त्व दिले आहे. 

- पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना २ लाख ८० हजार कोटी रुपये मिळाले आहेत. दोन वर्षांत शेतकऱ्यांसाठी बँकांकडून सुलभ कर्जात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. तसेच गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांना MSP च्या माध्यमातून अंदाजे १८ लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना स्वस्त खते मिळावीत यासाठी १० वर्षांत ११ लाख कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनBudgetअर्थसंकल्प 2024Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदी