शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 22:09 IST

अदानी समूह फक्त भाजपसोबत काम करतो, हा आरोप गौतम अदानी यांनी खोडून काढला.

Gautam Adani : देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने भाजपसाठी काम केल्याचा आरोप केला जातो. पण, आता स्वतः गौतम अदानी यांनी गुरुवारी(दि.26) हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मीडियाशी बोलताना त्यांनी व्यवसायातील मक्तेदारीपासून ते भाजपशासित राज्यांमध्ये काम करण्यापर्यंतच्या मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडले. 

एएनआय या वृत्तसंस्थेने गौतम अदानी यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही भाग शेअर केला आहे. गौतम अदानी म्हणाले की, 'अदानी समूह देशातील 25 राज्यांमध्ये काम करतो. आम्ही  काँग्रेस किंवा भाजपसोबत नाही, तर प्रत्येक सरकारसोबत काम करत आहोत. जोपर्यंत राजकारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणत्याही सरकारसोबत काम करण्यास हरकत नाही,' अशी प्रतिक्रिया अदानी यांनी दिली.

गौतम अदानी पुढे म्हणतात, 'आमचा समूह पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करतो. या क्षेत्रात आमच्यापेक्षा मोठ्या कंपन्या आहेत, पण त्या या क्षेत्रात 25 टक्केही काम करत नाहीत. आम्ही करत आहोत. त्या कंपन्या उद्योगाच्या आधारावर मोठ्या आहेत, पण पायाभूत सुविधांच्या आधारावर नाही. याचे कारण म्हणजे, हे क्षेत्र काम करण्यासाठी सर्वात कठीण क्षेत्रांपैकी एक आहे. 5 ते 6 वर्षे या व्यवसायात स्वत:ला वाहून घेतल्याशिवाय हा व्यवसाय करता येत नाही. कधीही प्रकल्प बंद पाडण्याचा धोका असतो. शिवाय, तुम्हाला 10 वर्षांनंतरच परतावा मिळतो, त्यामुळे इतका धीर कोणाकडे नाही.'

'आज आम्ही 25 राज्यांमध्ये काम करत आहोत. लोक अनेकदा म्हणतात की, अदानी ग्रुप भाजपच्या राज्यात काम करतो, पण आम्ही केरळमध्येही काम करतो. विंझीगम बंदर हा 20,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. तो प्रकल्प काँग्रेस सरकारने दिला. त्यामुळे आम्ही फक्त भाजपसोबत काम करतो असे नाही. आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार आहोत. जोपर्यंत राजकारण होत नाही, तोपर्यंत आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्प सरकारच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सरकारच्या मदतीनेच हे शक्य आहे,' असेही अदानी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी