शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 09:32 IST

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.ममता बॅनर्जींकडून भाजपला जनादेश स्वीकारण्याची विनंती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर टीम पाठवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर विजय मिळाला. यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने आले आहेत. "माझी शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय टीम पोहोचली आहे. असं यासाठी आहे कारण या ठिकाणी जनतेनं भाजपला स्वीकार केलं नाही," असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. "जनादेशाचा स्वीकार करण्याचं मी आवाहन करते. आपल्याला कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. "केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे," असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) "ममता म्हणाल्या भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप २४ तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत. टीम आणि नेते येत आहेत. ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते," असंही त्या म्हणाल्या. "मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेलं नाही. ते २० हजार कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लसीसाठी ३० हजार कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत," असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा