शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 09:32 IST

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.ममता बॅनर्जींकडून भाजपला जनादेश स्वीकारण्याची विनंती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर टीम पाठवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर विजय मिळाला. यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने आले आहेत. "माझी शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय टीम पोहोचली आहे. असं यासाठी आहे कारण या ठिकाणी जनतेनं भाजपला स्वीकार केलं नाही," असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. "जनादेशाचा स्वीकार करण्याचं मी आवाहन करते. आपल्याला कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. "केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे," असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders) "ममता म्हणाल्या भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप २४ तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत. टीम आणि नेते येत आहेत. ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते," असंही त्या म्हणाल्या. "मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेलं नाही. ते २० हजार कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लसीसाठी ३० हजार कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत," असंही त्या म्हणाल्या.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा