शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लागणार १० ते १५ वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 06:44 IST

शिफारशी टप्प्याटप्प्याने लागू होणार

एस. के. गुप्ता।नवी दिल्ली : जुने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बाजूला ठेवून त्याची जागा नव्या धोरणाने घेण्यास तब्बल ३४ वर्षे लागली. मात्र आता आखलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची संपूर्ण अंमलबजावणी करण्यास आणखी दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारसींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी लागू शकतो.

मातृभाषेतून शिक्षण देणे तसेच त्रिस्तरीय शिक्षणाबाबत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लवचिक भूमिका राखण्यात आली आहे. राज्यांनी विद्यार्थ्यांना हिंदी किंवा मराठी, तामिळ, तेलुगू, बंगाली आदि मातृभाषांतून किंवा इंग्रजीतून शिक्षण देण्याचा पर्याय निवडावा, असे या धोरणात म्हटले आहे.

५+३+३+४ या मॉडेलमध्ये बनविण्यात आलेले चार टप्पेपहिला टप्पानव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील पाच वर्षांत काही वेगळ््या तरतुदी आहेत. तीन ते आठ वर्षे वयापर्यंतची मुले पहिली तीन वर्षे अंगणवाडीमध्ये शिकतील. त्यानंतरच्या दोन वर्षांत ते पहिल्या व दुसºया इयत्तेत शिक्षण घेतील. या पाच वर्षांत मुलांना खेळांच्या माध्यमातून, चित्रांद्वारे किंवा कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाच्या मदतीने मातृभाषा किंवा संबंधित विभागांतील भाषेतून शिक्षण दिले जाईल.दुसरा टप्पा : या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दुसºया टप्प्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. त्यात ८ ते ११ वर्षे वयोगटातील मुले तिसरी ते पाचवी इयत्तेत शिकतील. त्यावेळी प्रयोगाधारित शिक्षणपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, चित्रकला आदी विषय शिकविले जातील.तिसरा टप्पा : नव्या शैक्षणिक धोरणाच्या तिसºया टप्प्याचा कालावधी तीन वर्षांचा आहे. सहावी ते आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश असेल. सहावीतील विद्यार्थ्यांना कोडिंग व व्होकेशनल कोर्सेस शिकविले जातील. तसेच व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांकडून इंटर्नशिप करून घेतली जाईल.चौथा टप्पा : याधोरणाच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्यात १४ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. शालेय शिक्षणातील नववी ते बारावी ही चार वर्षे त्यासाठी महत्त्वाची ठरविण्यात आली आहेत. या इयत्तांतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणते विषय घ्यावेत याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. जुन्या शिक्षणपद्धतीत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य अजिबात नाही. मात्र विद्यार्थी ११वीत गेला की त्याला अभ्यासाचे विषय निवडता येतात. पण आता या गोष्टींची जागा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध तरतुदी घेणार आहेत.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यासाठी एनसीईआरटीला एक वषार्हून अधिक काळ लागणार आहे. आगामी दोन वर्षांत नवीन शिक्षणपद्घती अस्तित्वात आणण्यासाठी काही ठोस पावले उचलली जातील.

टॅग्स :SchoolशाळाMumbaiमुंबईEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र