शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 7:05 PM

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं.

ठळक मुद्देअजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा आजही कुतूहलाचा विषय आहे.अजित पवारांना सोबत घेणं हे 'मिस कॅलक्युलेशन' होतं, असं मत सुशील मोदी यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन आता आठवडा उलटला असला, 'ठाकरे सरकार'ने आपलं काम सुरू केलं असलं, तरी त्याआधी महिनाभर रंगलेल्या सत्तानाट्याची अजूनही चवीनं चर्चा होते. खास करून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा तर आजही प्रचंड कुतूहलाचा विषय आहे. हे नेमकं कसं घडलं, का घडलं, घडलं की घडवलं, कोण बरोबर - कोण चूक, यावर वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. त्यात आता बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजपाचे नेते सुशील मोदी यांनीही 'मन की बात' केली आहे. 'आज तक' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत जिंकलो म्हणून विधानसभाही जिंकूच असं समजणं बरोबर नाही. २००३ मध्ये अटलजींच्या काळात राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभा आम्ही जिंकलो होतो, पण नंतर लोकसभेला पराभव झाला, याकडे सुशील मोदी यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात नेमकं काय झालं, हे ठाऊक नाही; पण अजित पवारांना सोबत घेणं हे मिस कॅलक्युलेशन (चुकीचं गणित) किंवा मिस अ‍ॅडव्हेन्चर (चुकीचं धाडस) होतं. अजित पवार आमदार घेऊन येतील असं वाटलं, पण ते आणू शकले नाहीत, असं त्यांनी नमूद केलं. ही चूक कशी झाली माहीत नाही, मात्र राजकारणात हार-जीत होतच असते. जे झालं त्याबद्दल वाईट वाटतं, असं म्हणत त्यांनी कुणावरही दोषारोप करणं टाळलं.

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. आधी भाजपानं, नंतर शिवसेनेनं आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादीनंही सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अखेर, बऱ्याच बैठका, राजी-नाराजीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सूत जुळलं होतं. हे तिघं सरकार स्थापन करणार, हे पक्कं झालं असतानाच, २३ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना टीव्हीवर झळकले होते आणि राज्यात राजकीय भूकंपच झाला होता.

त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बऱ्याच हालचाली झाल्या, कौटुंबिक - भावनिक आवाहनं झाली, पळवापळवी-पकडापकडीचे खेळ झाले, प्रकरण कोर्टात गेलं आणि साडेतीन दिवसात देवेंद्र सरकार कोसळलं. या घटनाक्रमाचे पडसाद पुढच्या राजकारणावर उमटत राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच, हे सुशील मोदी यांचं मत महत्त्वाचंच आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाण्याआधी अजित पवार यांनी आपल्याला कल्पना दिली होती आणि आपण त्यांना होकारही दिला होता, मात्र शपथविधीबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, असा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे