शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच; बिहारच्या मोदींची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 19:11 IST

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं.

ठळक मुद्देअजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा आजही कुतूहलाचा विषय आहे.अजित पवारांना सोबत घेणं हे 'मिस कॅलक्युलेशन' होतं, असं मत सुशील मोदी यांनी व्यक्त केलंय.

महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन आता आठवडा उलटला असला, 'ठाकरे सरकार'ने आपलं काम सुरू केलं असलं, तरी त्याआधी महिनाभर रंगलेल्या सत्तानाट्याची अजूनही चवीनं चर्चा होते. खास करून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ हा तर आजही प्रचंड कुतूहलाचा विषय आहे. हे नेमकं कसं घडलं, का घडलं, घडलं की घडवलं, कोण बरोबर - कोण चूक, यावर वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात. त्यात आता बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजपाचे नेते सुशील मोदी यांनीही 'मन की बात' केली आहे. 'आज तक' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीत जिंकलो म्हणून विधानसभाही जिंकूच असं समजणं बरोबर नाही. २००३ मध्ये अटलजींच्या काळात राजस्थान, मध्य प्रदेशच्या विधानसभा आम्ही जिंकलो होतो, पण नंतर लोकसभेला पराभव झाला, याकडे सुशील मोदी यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्रात नेमकं काय झालं, हे ठाऊक नाही; पण अजित पवारांना सोबत घेणं हे मिस कॅलक्युलेशन (चुकीचं गणित) किंवा मिस अ‍ॅडव्हेन्चर (चुकीचं धाडस) होतं. अजित पवार आमदार घेऊन येतील असं वाटलं, पण ते आणू शकले नाहीत, असं त्यांनी नमूद केलं. ही चूक कशी झाली माहीत नाही, मात्र राजकारणात हार-जीत होतच असते. जे झालं त्याबद्दल वाईट वाटतं, असं म्हणत त्यांनी कुणावरही दोषारोप करणं टाळलं.

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून खटका उडाल्यानं, महायुतीला स्पष्ट बहुमत असतानाही त्यांना सरकार स्थापन करता आलं नव्हतं. आधी भाजपानं, नंतर शिवसेनेनं आणि त्या पाठोपाठ राष्ट्रवादीनंही सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अखेर, बऱ्याच बैठका, राजी-नाराजीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सूत जुळलं होतं. हे तिघं सरकार स्थापन करणार, हे पक्कं झालं असतानाच, २३ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना टीव्हीवर झळकले होते आणि राज्यात राजकीय भूकंपच झाला होता.

त्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बऱ्याच हालचाली झाल्या, कौटुंबिक - भावनिक आवाहनं झाली, पळवापळवी-पकडापकडीचे खेळ झाले, प्रकरण कोर्टात गेलं आणि साडेतीन दिवसात देवेंद्र सरकार कोसळलं. या घटनाक्रमाचे पडसाद पुढच्या राजकारणावर उमटत राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर, अजित पवारांना सोबत घेण्याचं गणित चुकलंच, हे सुशील मोदी यांचं मत महत्त्वाचंच आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना भेटायला जाण्याआधी अजित पवार यांनी आपल्याला कल्पना दिली होती आणि आपण त्यांना होकारही दिला होता, मात्र शपथविधीबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नव्हती, असा खुलासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'एबीपी माझा'ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे