शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आयटीला हवी ‘वर्क फ्रॉम होम’ची कायम तरतूद; नॅसकॉम देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 12:07 AM

कामगार कायद्यात बदलाची मागणी

बंगळुरू : आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करता यावे (वर्क फ्रॉम होम) यासाठी कायद्यात बदल करून तसेच कामाच्या तासांचे बंधन काढून टाकण्याची मागणी देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाकडून केली जात आहे. यामुळे मुख्यत: महिला आणि विद्यार्थ्यांना लाभ होईल, असा दावा केला जात आहे.

देशात सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी देण्यात आली आहे. ही सवलत कायमस्वरूपी मिळण्याची मागणी आता या उद्योगाकडून केली जात आहे. यामुळे कंपनी आणि कामगार अशा दोघांचा फायदा होणार असल्याचा दावा या उद्योगाकडून केला जात आहे.

आयटी उद्योगातील धुरिणांनी नुकतीच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. यासाठी कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान उद्योगांसाठी काम करणाºया नॅसकॉमला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्याची शिफारस केली जाईल. या शिफारशीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी होऊ शकणार आहे.

२५ मार्चपासून देशामध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे आयटी उद्योगातील सुमारे ९० टक्के कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. येत्या ३१ जुलैपर्यंत ही सवलत मिळणार आहे. ही सवलत कायमस्वरूपी मिळण्याची या उद्योगाची मागाणी आहे. असे झाल्यास कंपन्यांना कमी जागा लागेल व त्यांचा आर्थिक लाभ होईल. याशिवाय शहरांमधील वाहतूक व्यवस्थांवरील ताणही काही प्रमाणात कमी होण्याचा दावा केला जात आहे.या आहेत आयटी उद्योगाच्या मागण्या

कामाचे तास आणि शिफ्टमध्ये बदल करता यावेत यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल.

आयटी कायद्यामध्ये काही बदल व्हावेत. कर्मचारी घरून काम करणार असल्यामुळे त्यासाठी जो खर्च येणार आहे तो खर्च व्यवसायाचा खर्च म्हणून मानला जावा.

दूरसंचार विभागाने वर्क फ्रॉम होमसाठी परवानगी देतानाच रहिवासी क्षेत्रामधील आपले नेटवर्क आणखी प्रबळ करावे.

कामाच्या जागेवरील सुरक्षितता आणि आरोग्यविषयक सोयी-सुविधांबाबत मालकाची जबाबदारी कमी करावी. कर्मचारी घरूनच काम करणार असल्याने ती मालकावर राहणार नाही.

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी ऐवजी राष्टÑीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) खाते उघडण्यास परवानगी द्यावी. याचे कारण येथे कर्मचारी अनेक ठिकाणी काम करू शकणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याITमाहिती तंत्रज्ञान