शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

न्यायाधीशांच्या आत्मसंयमामुळेच ते टीकेचे लक्ष्य - एन.व्ही. रामणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 1:48 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात एन.व्ही. रामणा बोलत होते.

नवी दिल्ली : न्यायाधीश आत्मसंयम राखत असल्यामुळे ते टीकेचे लक्ष्य सहजपणे ठरतात आणि मसालेदार गप्पा व चर्चेचा ते बळी ठरत आहेत, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती एन.व्ही. रामणा यांनी व्यक्त केले. ते शनिवारी येथे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आर. भानुमती यांनी लिहिलेल्या ‘ज्युडिशियरी, जजेस अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आॅफ जस्टीस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.न्या. रामणा म्हणाले, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनीसुद्धा सावधगिरीचा इशारा दिला. बोबडे म्हणाले होते की, ‘न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य हे अंमलबजावणीच्या स्वांतत्र्यापुरते मर्यादित नाही; परंतु इतर अनेक दबाब आणि कलुषित मते असतानाही न्यायव्यवस्था स्वातंत्र्य घेते.’स्वातंत्र्य टिकून राहण्यासाठी न्यायाधीशांना त्यांच्या सामाजिक आयुष्यात तोल सांभाळावा लागतो. ही पूर्ण जबाबदारी न्यायाधीशाने स्वत:वर लादून घेतलेल्या निर्बंधांतून पार पाडायची असते.न्यायाधीशांना त्यांच्या स्वत:च्या समर्थनासाठी बोलतानाही आत्मसंयम पाळावा लागतो; पण आता त्यांनाच टीका करण्यासाठीचे सहजसाध्य लक्ष्य समजले गेले आहे व हा विषय समाजमाध्यमांचा व तंत्रज्ञानाचा फारच विस्तार झाल्यामुळे आणखी गुंतागुंतीचा बनला आहे, असे रामणा म्हणाले.रामणा म्हणाले, ‘समाजमाध्यमांतून चालणाऱ्या मसालेदार गप्पा व बदनामीकारक सोशल मीडिया पोस्टस्चे न्यायाधीश हे त्यामुळेच बळी ठरत आहेत. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, न्यायाधीशाचे आयुष्य हे गुलाबफुलाच्या पाकळ्यांचा पलंग नाही. आजच्या काळातील न्यायाधीशाला इतर कोणत्याही व्यवसायात ज्याची बरोबरी होऊ शकणार नाही, अशा त्यागांची गरज आहे व हेच देशाचे भवितव्य कणखर व स्वतंत्र न्यायाधीशांवर उभे राहण्यासाठी आवश्यक आहे.’