शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

दविंदर सिंग प्रकरणाची ६ महिन्यांत चौकशी करा; पुलवामा हल्ल्याचाही फेरतपास हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 05:39 IST

दविंदर सिंग पुलवामा जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह पकडले गेलेले पोलीस उपअधीक्षक दविंदर सिंग यांच्या प्रकरणाची सहा महिन्यांच्या आत चौकशी पूर्ण करा अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी केली. दविंदर सिंग यांना गप्प करण्यासाठी आणि ते प्रकरण दाबून टाकण्यासाठीच त्यांच्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्याचाही फेरतपास करावा. हा हल्ला झाला त्यावेळी दविंदर सिंग पुलवामा जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक होते. त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या प्रकरणाबाबत मोदी सरकारने बाळगलेले मौन संशयास्पद आहे. दविंदरसिंग यांच्या अटकेनंतर उपस्थित झालेल्या प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरे दिली पाहिजेत असेही काँग्रेसने म्हटले आहे. दविंदर सिंग यांना गप्प करण्यासाठीच त्यांच्या प्रकरणाची चौकशी एनआयएचे प्रमुख योगेशचंदर मोदी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. एनआयएच्या प्रमुखांचा ‘दुसरे मोदी' असा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगली तसेच गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांचे हत्या प्रकरण यांचा तपास योगेशचंदर मोदी यांनीच केला होता.

इतके आरडीएक्स आले कुठून?काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी सांगितले की, दविंदर सिंग हे काही साधेसुधे पोलीस अधिकारी नव्हते. जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या विदेशी राजदूतांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा सहभाग होता. पुलवामा हल्ल्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलेले आरडीएक्स नेमके कुठून आले होते, या प्रश्नाचेही उत्तर मिळायला हवे. दविंदरसिंग यांचे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा योग्य पद्धतीने तपास व्हायला हवा.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेस