शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

इंटरनेट शटडाऊन, भारत पुन्हा ‘टाॅप’; ५८.३ कोटी डॉलर्सचा देशाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 6:52 AM

गेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले

नवी दिल्ली : सर्वात जास्त वेळेस इंटरनेट ब्लॉक किंवा बंद करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात भारतामध्ये तब्बल १०६ वेळेस इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे. 

सर्वांत जास्त वेळेस इंटरनेट शटडाउन केलेले देश

भारत - १०६, म्यानमार - १५, इराण - ०५, सुदान - ०५, क्युबा - ०४, जॉर्डन - ०४, इथिओपिया - ०३, युगांडा - ०३

कोणत्या राज्यात सर्वाधिक घटनागेल्या वर्षभरात भारतात १०६ वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी ८५ वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अधिकारी इंटरनेट व्यत्यय लादणे सुरू ठेवतात जो दीर्घकाळ कायम असतो, असे 'ॲक्सेस नाऊ'ने जारी केलेल्या अहवालात  नमूद केले आहे.  

२०२१ मधील आकडेवारी

१८२ वेळा जगातील ३४ देशांमध्ये इंटरनेट बंदी घालण्यात आली होती.

५८.३ कोटी डॉलर्सचा भारताला फटका या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या 'टॉप१०व्हीपीएन' या रिसर्च ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशावरून झालेले इंटरनेट शटडाउन एकूण १,१५७ तास चालले होते. परिणामी २०२१ मध्ये ५८.३ कोटी डॉलर्सचा फटका बसला. तर, या इंटरनेट बंदीचा ५९ कोटी नागरिकांवर परिणाम झाला.

टॅग्स :Internetइंटरनेट