शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भातील 'त्या' विधानावर नीती आयोगाच्या सदस्याचा माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 09:22 IST

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी रविवारी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

ठळक मुद्दे सारस्वत यांनी अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो असं म्हटलं होतं.'कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो' आपले विधान हे संदर्भ तोडून प्रसारित झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी रविवारी (19 जानेवारी) एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो असं म्हटलं होतं. सारस्वत यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आणि त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. मात्र यानंतर वक्तव्यावरून त्यांनी माफी मागितली आहे. 

'कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो' असं व्ही.के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. तसेच आपले विधान हे संदर्भ तोडून प्रसारित झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वक्तव्याचा काश्मीरमधील उद्योजकांच्या संघटनेने निषेध केला असून, त्यांना तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे. अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो असं नीती आयोगाच्या सदस्यांनी म्हटल्यामुळे वाद निर्माण झाला होता. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. 

'काश्मीरमध्ये हे सर्व नेते कशासाठी जाऊ इच्छित आहेत? दिल्लीच्या रस्त्यांवर ज्या प्रकारे आंदोलनं सुरू आहेत. त्यांना काश्मीरच्या रस्त्यांवरही अशीच आंदोलनं करायची आहेत. सोशल मीडियाचा ते वापर करतात. त्यामुळे जर तिकडे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसंही इंटरनेटच्या माध्यमातून तिकडे लोक काय पाहतात? अश्लिल चित्रपट पाहण्याशिवाय लोक काहीही करत नाहीत' असं व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं होतं. 

जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील 10 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. काश्मीरमधील केवळ कुपवाडा आणि बांदीपोरा या ठिकाणी 2जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. 15 जानेवारीपासून सात दिवसांपर्यंत जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. गृहविभागाकडून देण्यात आलेल्या आदेशामध्ये काश्मीर विभागात अतिरिक्त 400 इंटरनेट कियोस्कची स्थापना केली जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देण्यात येईल. पर्यटकांच्या सुविधेच्या दृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत. जम्मू परिसरातील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासीमध्ये ई-बँकींगसह सुरक्षित वेबसाईट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाईलवर 2जी मोबाईल इंटरनेटला परवानगी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

3500 किलोमीटर दूरवर हवेतच नेस्तनाबूत होणार शत्रूचं विमान, K-4 बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी

छत्रपती शिवरायांनाही जिंकता आला नव्हता असा 'हा' अजिंक्य किल्ला; काय आहे यामागचं रहस्य? 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNIti Ayogनिती आयोगInternetइंटरनेटcinemaसिनेमा