शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

केंद्र सरकारनं नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा आजपासून जम्मू-काश्मीर दौ-यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 10:31 IST

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे तसेच लोकभावना समजून निर्णय घेता यावेत, यासाठी केंद्र सरकारने नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांचा आजपासून जम्मू- काश्मीर दौरा सुरू झाला आहे. 

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे तसेच लोकभावना समजून निर्णय घेता यावेत, यासाठी केंद्र सरकारने नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांचा आजपासून जम्मू- काश्मीर दौरा सुरू झाला आहे. 

इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख असणारे दिनेश्वर शर्मा या दौ-यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना व तसेच इतर महत्त्वाच्या लोकांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील. मात्र ते हुर्रियतशी चर्चा करणार का?, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

जाँईँट रेझिस्टन्स लिडरशिपचे सदस्य सय्यद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुख आणि यासीन मलिक यांनी दिनेश शर्मा यांच्याशी चर्चा करण्याची करण्याची शक्यता फेटाळली आहे. शर्मा यांनी मात्र आपला पहिला दौरा केवळ पुढील कामाचा आराखडा तयार करणे व राज्यातील वस्तुस्थिती जाणून घेणे यासाठीच असेल असे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. 'मला आधी लोकांना भेटू द्या, त्यांच्या भावना समजू द्या', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दिनेश्वर शर्मा आज श्रीनगरमध्ये असून ते ९ तारखेस जम्मू विभागात जातील व ११ तारखेस दिल्लीला परत येतील. 

दिनेश्वर शर्मा हे १९७९ च्या तुकडीचे केरळ कँडरचे आयपीएस अधिकारी आहेत. २०१४ साली त्यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. जम्मू आणि काश्मीरमधील विविध समस्या आणि अशांत वातावरणाच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसाममधील बंडखोर गटांशी चर्चा करण्याचीही कामगिरीही त्यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरBJPभाजपा