शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

देशातील निम्म्या भागावर दुष्काळाचं संकट? मोदी सरकारसमोर मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 17:28 IST

यंदा दुष्काळाचं संकट आणखी गहिरं होणार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर उद्या नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. मोदींच्या या कार्यकाळात त्यांच्यासमोर अनेक आव्हानांचा डोंगर असेल. देशातील जवळपास निम्म्या भागात दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: दक्षिण भारतातदुष्काळाची दाहकता जास्त असेल असा अंदाज आहे. त्यामुळे अनेक राज्यांना केंद्राच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, आयआयटी गांधीनगरमधील दुष्काळाची माहिती देणाऱ्या यंत्रणेनं धोक्याचा इशारा दिला आहे. देशातील 40 टक्क्यांहून अधिक भागात दुष्काळ पडू शकतो. यापैकी निम्म्या भागातील दुष्काळाची तीव्रता गंभीर असू शकेल, अशी भीती आयआयटी गांधीनगरकडून वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे दरम्यान होणाऱ्या मान्सूनपूर्व पावसात यंदा 22 टक्क्यांनी घट झाली आहे. देशातील दोन तृतीयांश भागात कमी किंवा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी मान्सूनपूर्व पावसाची नोंद यंदा झाली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 49 टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागाला दुष्काळाचा जबरदस्त फटका बसू शकतो. मान्सूनपूर्व पाऊस कमी झाल्यानं ग्रामीण भागासह शहरी भागातही पाणीसंकट तीव्र होणार आहे. पाऊस कमी झाल्यानं ऊस, भाज्या, कापूस आणि फळांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 15 मे च्या दरम्यान 75.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या काळात सरासरी 96.8 मिलीमीटर इतका पाऊस होतो. त्यात यंदा घट झाली आहे. 

टॅग्स :droughtदुष्काळIndiaभारत