शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

इन्फोसिसने ९ हजार कर्मचाऱ्यांना काढले

By admin | Updated: January 21, 2017 05:18 IST

इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

बंगळुरू : इन्फोसिसने गेल्या वर्षभरात ८ हजार ते ९ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. स्वयंचलित यांत्रिकीकरणामुळे कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या या लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, अशी माहिती कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख कृष्णमूर्ती शंकर यांनी दिली आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेल्या ग्लोबल शेपर्सच्या वतीने बंगळूरमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शंकर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आम्ही प्रत्येक तिमाहीत सुमारे २ हजार लोकांना कामावरून काढत आहोत. इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी आहे. इन्फोसिप्रमाणेच अन्य सर्व आयटी कंपन्या स्वयंचलित तंत्रज्ञानावर भर देत आहेत. बीपीओ, अ‍ॅप्लिकेशन मॅनेजमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या आपल्या पारंपरिक क्षेत्रात कंपन्या स्वयंचलित तंत्रज्ञान आणत आहेत. त्याचा फटका कर्मचाऱ्यांच्या रोजगाराला बसत आहे. विप्रोकडे होल्मेस नावाचा स्वयंचलितीकरण प्लॅटफॉर्म आहे. फिलिप्समधून इन्फोसिसमध्ये २0१५मध्ये दाखल झालेल्या कृष्णमूर्ती शंकर यांनी सांगितले की, यांत्रिकीकरणाची गती जसजशी वाढत जाईल, तसतशी कंपनीकडे असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत जाईल. वास्तविक कर्मचाऱ्यांची संख्या आताच मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सगळीच कर्मचारी कपात यांत्रिकीकरणामुळे झालेली नाही. कंपनीची वित्तीय स्थिती वाईट असल्याचा परिणामही काही प्रमाणात झाला आहे. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत आम्ही ५,७00 लोकांची नव्याने भरती केली. गेल्या वर्षी याच काळात १७ हजार लोकांची भरती करण्यात आली होती. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या कर्मचारी संख्येत मोठी घट झाली आहे. (वृत्तसंस्था)>3200 लोकांना विप्रोने नोव्हेंबरमध्ये कामावरून काढले, असे कंपनीचे जागतिक मनुष्य बळ प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले. 4500 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे कंपनीचे यंदाच्या वित्त वर्षात लक्ष्य आहे. कर्मचारी कपातीमुळे आपल्या नफ्यात सुधारणा करणे कंपन्यांना शक्य होत आहे.