शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

बेवारस मृतदेहाच्या ओळखीसाठी ‘आधार’ची माहिती निरुपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 3:55 AM

‘युआयडीएआय’ची हायकोर्टात कबुली

मुंबई : एखाद्या बेवारस मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे ताडून पाहून त्या मयताची ओळख पटविण्यासाठी ‘आधार’ कार्डांसाठी गोळा केलेल्या माहितीची काहीच मदत होऊ शकत नाही, असे ‘आधार’चे काम पाहणाऱ्या ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (युआयडीएआय) मुंबई उच्च न्यायालयास कळविले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी एका अनोळखी महिलेचा मृतहेद मिळाला. पोलिसांनी खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू झाला. परंतु मृतदेहाची ओळख पटविण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही ओळख पटली नाही. अखेर पोलिसांनी ‘आधार’ कायद्याच्या कलम ३३(१) अन्वये मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे ‘आधार’ कार्डांसाठी घेतलेल्या ठश्यांशी ताडून पाहून ओळख पटविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. परंतु त्या न्यायालयाने तसा आदेश दिला नाही म्हणून सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका केली. न्या. विश्वास काशिनाथ जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली तेव्हा अ‍ॅथॉरिटीचे मुंबईतील उपसंचालक भालचंद्र विष्णू जिचकर स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्र सरकारचे ज्येष्ठ स्थायी वकील बी. बी. कुलकर्णी यांनी असे सांगितले की, देशभरात १२२ कोटींहून अधिक व्यक्तींना ‘आधार’ कार्ड देण्यात आली आहेत. परंतु अ‍ॅथॉरिटीकडे जी तंत्रशास्त्रीय संरचना उपलब्ध आहे त्यात संबंधित व्यक्तीचा ‘आधार’ क्रमांक न देता हाताचे ठसे ताडून पाहण्याची सोय नाही. त्यामुळे या प्रकरणी तपासी अधिकाऱ्यास मदत करण्याची अ‍ॅथॉरिटीची इच्छा असली तरी ती करणे शक्य नाही.सरकारची याचिका फेटाळलीअ‍ॅथॉरिटीने असेही सांगितले की, आम्ही ‘आधार’साठी बोटांचे ठसे व डोळ््याच्या बुब्बुळाचे स्कॅन यासारखी बायोमेट्रिक माहिती घेण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतो ते न्यायवैद्यकाच्या दृष्टीने उपयुक्त नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचे ठसे आमच्याकडे असलेल्या ठशांशी जुळतात का हे ताडून पाहणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यावर न्या. जाधव यांनी म्हटले की, या पार्श्वभूमीवर अनुकूल आदेश न देता सत्र न्यायालयाने पोलिसांचा अर्ज निकाली काढणे चुकीचे होते, असे वाटत नाही. याआधारे सरकारची याचिका फेटाळण्यात आली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMumbai High Courtमुंबई हायकोर्ट