शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, आधुनिक शस्त्रांस्त्रांनी ITBP जवान सज्ज 

By महेश गलांडे | Published: October 25, 2020 9:44 AM

भारता-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू आहे. आयटीबीपीच्या 59 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दलातील जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी चीनवर हल्लाबोल केला.

ठळक मुद्देभारता-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू आहे. आयटीबीपीच्या 59 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दलातील जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी चीनवर हल्लाबो

नवी दिल्ली - भारत हा विस्तारवादी देश नसून शांतीप्रिय देश आहे, त्यामुळे भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिलंय जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखच्या भूमीवर जाऊन चीनला ठणकावले होते. मात्र, अद्यापही लडाखच्या सीमारेषेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच, राफेल विमानाने भारतीय वायूदलात एंट्री केल्याने देशाची ताकद आणखी वाढली आहे. त्यातच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्र देण्याची तयारी सुरू आहे.

भारता-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू आहे. आयटीबीपीच्या 59 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दलातील जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी चीनवर हल्लाबोल केला. त्यासोबतच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी चीनला ठणकावले. भारत हा वसुधैव कुटुम्बकम ( पृथ्वी हेच कुटुंब) वर विश्वास ठेवत आहे. तसेच, देशाची संस्कृती आम्हाला शस्त्र आणि अस्त्र दोन्हीची पूजा करायला शिकवते, असेही त्यांनी म्हटले. 

आयटीबीपी स्थापना दिवसानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयटीबीपी जवानांच्या धाडसाला आणि वीरतेचं शब्दात वर्णन करणं शक्य नसल्याचं म्हटलंय. जगातील सर्वात कठीण प्रदेशात आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठीचं त्यांचं कार्य उल्लेखनीय असल्याचं शहा यांनी म्हटलंय. 

आयटीबीपीकडून चीन व भारत या दोन्ही देशातील 3488 किमीच्या सीमारेषेचं संरक्षण करण्यात येत आहे. एलएसीवर तैनात होऊन हे जवान भारतमातेची सेवा करत आहेत. काही दिवसांपूर्वी आयटीबीपीच्या जवानांनी 15-16 जून रोजी भारत आणि चीनदरम्यान झालेल्या हिंसक लढाईत रात्रभर आपल्या वीरतेचं दर्शन घडवलं. चीनच्या पीएलएच्या सैनिकांना ठोस प्रत्युत्तर देत आपली ताकद दाखवली, असेही शहा यांनी म्हटलं. 

नरेंद्र मोदी सरकार सैन्य दलास आधुनिक आणि ताकदवर बनविण्यासाठी दृढनिश्चयी आहेत. त्यामुळेच, आयटीबीपीच्या 47 सीमा चौकी स्थापन करण्यासाठी सामान, विशेष कपडे आणि अधिक उंचीवाल्या स्थानावर गिर्यारोहक उपकरणांच्याआधारे गृहमंत्रालयाकडून मंजूर देण्यात आली आहे. तसेच, आधुनिक शस्त्रांस्त्रांचाही पुरवठा करण्यात आला आहे. केंद्राने सन 2019-20 या आर्थिक वर्षात या सीमा सुरक्षा दलासाठी 7223 कोटी रुपयांचं बजेटही मंजूर केलं आहे.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmit Shahअमित शहाprime ministerपंतप्रधान