शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 20:34 IST

या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे.

भारतामध्ये 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या कालावधीत बहुसंख्यक हिंदू समाजाच्या लोकसंख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीत देशाच्या लोकसंख्येतील हिंदू समाजाचा वाटा 6 टक्क्यांनी घटला आहे. याशिवाय, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांसोबत तुलना करता, तेथे बहुसंख्यक मुस्लिम समाजाचा एकूण लोकसंख्येतील वाटा वेगाने वाढला आहे. या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे.

काय आहे अभ्यासात -अभ्यासानुसार, या कालावधीत एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 5 टक्क्यांनी वाढला आहे, ख्रिश्चनांचा वाटा 5.38 टक्के आणि शीखांचा वाटा 6.58 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय बौद्धांचा वाटाही वाढला आहे. अहवालानुसार, 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा 84 टक्के होता. आता तो 78 टक्क्यावर आला आहे. गेल्या ६५ वर्षांपूर्वी भारताच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा 9.84 टक्के एवढा होता. तो आता 14.09 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या देशातील बहुसंख्य समाजाची लोकसंख्या कमी झाली, अशा शेजारील देशांमध्ये म्यानमारनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 

या कालावधीत म्यानमारमध्ये बहुसंख्यक बौद्ध समुदायाच्या लोकसंख्येचा वाटा 10 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच नेपाळच्या लोकसंख्येतही बहुसंख्यक हिंदुंचा वाटा 3.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या अहवालात एकूण 167 देशांचा अभ्यास केला आहे. भारतात स्थिरता दिसून आली आहे. भारतातील अल्पसंख्याकांना केवळ संरक्षणच मिळालेले नाही, तर त्यांची लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याचे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम