शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 20:34 IST

या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे.

भारतामध्ये 1950 ते 2015 या 65 वर्षांच्या कालावधीत बहुसंख्यक हिंदू समाजाच्या लोकसंख्येत मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीत देशाच्या लोकसंख्येतील हिंदू समाजाचा वाटा 6 टक्क्यांनी घटला आहे. याशिवाय, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या इतर देशांसोबत तुलना करता, तेथे बहुसंख्यक मुस्लिम समाजाचा एकूण लोकसंख्येतील वाटा वेगाने वाढला आहे. या अभ्यासानुसार, एकिकडे भारतामध्ये हिंदू समाजाचा वाटा घटला आहे, तर अल्पसंख्यक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शिख समाजाच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. तसेच, हिंदूंशिवाय, जैन आणि पारशी समाजाची लोकसंख्याही घटली आहे.

काय आहे अभ्यासात -अभ्यासानुसार, या कालावधीत एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा 5 टक्क्यांनी वाढला आहे, ख्रिश्चनांचा वाटा 5.38 टक्के आणि शीखांचा वाटा 6.58 टक्क्यांनी वाढला आहे. याशिवाय बौद्धांचा वाटाही वाढला आहे. अहवालानुसार, 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा 84 टक्के होता. आता तो 78 टक्क्यावर आला आहे. गेल्या ६५ वर्षांपूर्वी भारताच्या लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा 9.84 टक्के एवढा होता. तो आता 14.09 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या देशातील बहुसंख्य समाजाची लोकसंख्या कमी झाली, अशा शेजारील देशांमध्ये म्यानमारनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. 

या कालावधीत म्यानमारमध्ये बहुसंख्यक बौद्ध समुदायाच्या लोकसंख्येचा वाटा 10 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तसेच नेपाळच्या लोकसंख्येतही बहुसंख्यक हिंदुंचा वाटा 3.6 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने आपल्या अहवालात एकूण 167 देशांचा अभ्यास केला आहे. भारतात स्थिरता दिसून आली आहे. भारतातील अल्पसंख्याकांना केवळ संरक्षणच मिळालेले नाही, तर त्यांची लोकसंख्याही झपाट्याने वाढत असल्याचे या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :IndiaभारतHinduहिंदूMuslimमुस्लीम