शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

...तेव्हा भारताची नऊ मिसाईल सज्ज होती; अभिनंदनला सोडलं नसतं तर युद्ध झालं असतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 12:15 IST

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार रहावं असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता

नवी दिल्ली -  विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्यात आलं नाही तर पाकिस्तानने युद्धासाठी तयार रहावं असा इशारा भारतानेपाकिस्तानला दिला होता. 27 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तानविरुद्ध मिसाईल युद्ध करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यादृष्टीने केंद्र सरकारने निर्णय देखील घेतला होता. पाकिस्तानकडूनही हल्ला केल्यास चोख उत्तर देऊ असं सांगण्यात आलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी एकमेकांच्या संपर्कात होते. 

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आमच्या ताब्यात आहे असं पाकिस्तानने घोषित केलं त्यावेळी भारताने पाकिस्तानला हा इशारा दिला होता. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या एफ 16 या विमानाचा पाठलाग करत पाकिस्तानच्या हद्दीत पोहचले होते. त्यानंतर अभिनंदन यांचे मिग 21 विमान तांत्रिक कारणामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं होतं. पॅरोशूटच्या माध्यमातून अभिनंदन वर्धमान जमिनीवर आले तेव्हा पाकिस्तानमधील स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडलं. यानंतर पाकिस्तान सैन्यांनी अभिनंदन यांना कैद केले होते. एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. भारत आणि पाकिस्तानमधील नेते एकमेकांना आव्हान देण्याची भाषा करत होते. मात्र पडद्यामागे रॉ चे अधिकारी अनिल धस्माना आणि पाकिस्तान इंटर सर्विसेज इंटेलिजेंसचे प्रमुख लेफ्टनंट असीम मुनीर यांच्या संवाद सुरु होता. 

याच दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला. जर पाकिस्ताने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन पायलट यांच्या जिवितास धोका पोहचेल असं काही कृत्य केलं तर भारत पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई करेल अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली आहे अशी माहिती डोवाल यांनी अमेरिकेला दिली. हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालानुसार 27 फेब्रुवारी रोजी भारत पाकिस्तानवर मिसाईल हल्ला करण्याच्या तयारीत होतं. 

भारताच्या या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयात हडकंप माजला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना कैदेत ठेऊन काही फायदा नसल्याने अभिनंदन यांना भारताला सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. 27 फेब्रुवारी रोजीच पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी 28 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या संसदेत अभिनंदन वर्धमान यांना दोन्ही देशात शांतता राहावी म्हणून सोडत असल्याचं जाहीर केलं..त्यानंतर 1 मार्च रोजी अभिनंदन वर्धमान वाघा बोर्डरमार्गे पुन्हा भारतात परतले. 

17 मार्च रोजी रॉयटर या संस्थेनेही भारत पाकिस्तानवरुद्ध मिसाईल युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं. 27 फेब्रुवारीच्या संध्याकाळी पाकिस्तानवर 9 मिसाईल हल्ला करण्यासाठी भारत सज्ज होतं. तर पाकिस्तानकडूनही भारतावर मिसाईल हल्ला करण्यात येणार होता अशी माहिती पाकिस्तानच्या सूत्रांनी दिली होती असं रॉयटरच्या रिपोर्टमध्ये नमूद केलं होतं.  

(विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?)

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदी