शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

रेल्वेकडून पहिल्यांदाच १९ अधिकाऱ्यांवर कारवाई, एकाचवेळी सर्वांना केलं बडतर्फ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:30 IST

indian railway : कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways)इतिहासात पहिल्यांदा आपल्या विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. रेल्वे विभागाने आपल्या १९ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने खराब कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत सरकारी नोकरांच्या नियतकालिक आढावा (Periodic Review) अंतर्गत केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, १९७२ च्या कलम ५६ (J)/(I), नियम ४८ नुसार बुधवारी विभागाने १९ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व अधिकारी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, सीएलडब्ल्यू, नार्थ फ्रंट रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण-पश्चिम रेल्वे, डीएलडब्ल्यू, उत्तर-मध्य रेल्वे, आरडीएसओ, ईडी सेलचे सेलेक्शन ग्रेट आणि उत्तर रेल्वेमधील विविध पदांवर कार्यरत होते. 

आतापर्यंत ७७ अधिकाऱ्यांनी घेतली व्हीआरएसअश्विनी वैष्णव यांनी (Railway Minister Ashwani Vaishnav) केंद्रीय रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आतापर्यंत जवळपास ७७ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्हीआरएस (VRS) घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यात जवळपास ९६ अधिकाऱ्यांना व्हीआरएस देण्यात आला आहे. 

'निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही'दरम्यान, अशाप्रकारच्या कारवाईमुळे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून स्पष्ट संदेश देण्यात येत आहे की, कामकाजाच्या दरम्यान निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि या नियमांद्वारे सरकार कामाची समीक्षा करून जबरदस्तीने व्हीआरएस सुद्धा देऊ शकते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता की, जे अधिकारी काम नाही करू शकत, त्यांनी व्हीआरएस घेऊन घरी बसावे. अन्यथा त्यांना बडतर्फ केले जाईल. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे