शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

रेल्वेकडून पहिल्यांदाच १९ अधिकाऱ्यांवर कारवाई, एकाचवेळी सर्वांना केलं बडतर्फ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:30 IST

indian railway : कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways)इतिहासात पहिल्यांदा आपल्या विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. रेल्वे विभागाने आपल्या १९ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने खराब कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत सरकारी नोकरांच्या नियतकालिक आढावा (Periodic Review) अंतर्गत केंद्रीय नागरी सेवा (CCS) पेन्शन नियम, १९७२ च्या कलम ५६ (J)/(I), नियम ४८ नुसार बुधवारी विभागाने १९ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या १९ अधिकाऱ्यांमध्ये १० ज्वाइंट सेक्रेटरी (Joint Secretary) स्तरावरील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व अधिकारी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, सीएलडब्ल्यू, नार्थ फ्रंट रेल्वे, पूर्व रेल्वे, दक्षिण-पश्चिम रेल्वे, डीएलडब्ल्यू, उत्तर-मध्य रेल्वे, आरडीएसओ, ईडी सेलचे सेलेक्शन ग्रेट आणि उत्तर रेल्वेमधील विविध पदांवर कार्यरत होते. 

आतापर्यंत ७७ अधिकाऱ्यांनी घेतली व्हीआरएसअश्विनी वैष्णव यांनी (Railway Minister Ashwani Vaishnav) केंद्रीय रेल्वेमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आतापर्यंत जवळपास ७७ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्हीआरएस (VRS) घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यात जवळपास ९६ अधिकाऱ्यांना व्हीआरएस देण्यात आला आहे. 

'निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही'दरम्यान, अशाप्रकारच्या कारवाईमुळे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून स्पष्ट संदेश देण्यात येत आहे की, कामकाजाच्या दरम्यान निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि या नियमांद्वारे सरकार कामाची समीक्षा करून जबरदस्तीने व्हीआरएस सुद्धा देऊ शकते. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला होता की, जे अधिकारी काम नाही करू शकत, त्यांनी व्हीआरएस घेऊन घरी बसावे. अन्यथा त्यांना बडतर्फ केले जाईल. 

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे