शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

Corona : रेल्वेने तिकीट रिफंडच्या नियमांत केलाय मोठा बदल, तुम्हालाही माहीत असायलाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 09:51 IST

या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

ठळक मुद्देआता प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान लागू असेल हा नियमटीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस 

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि रेल्वेस्थानकांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता, 21 मार्च ते 15 एप्रिलदरम्यान रेल्वेने एखादी रेल्वेगाडी रद्द केल्यास, कुठल्याही स्थानकावर प्रवासाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत तिकीट जमा करून रिफंड घेता येणार आहे. सध्या रेल्वे रद्द झाल्यानंतर तीन तासांच्या आतच रिंफंड मिळवता येतो.

या शिवाय, रेल्वेगाडी रद्द न झाली नाही, मात्र या काळात प्रवाश्याला प्रवास करायचा नसेल तर त्याला प्रवासाच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आता तो स्थानकावर जाऊन TDR (Ticket Deposit Receipt) फाइल करू शकतो. सध्या असे तीन दिवसांच्या आत करणे अनिवार्य होते. या आदेशानुसार, चीफ कॉमर्शियल ऑफिसरसमोर टीडीआर फाइल करण्याचा कालावधी 10 दिवसांवरून 60 दिवस करण्यात आला आहे, तर ज्या प्रवाशाला 139 च्या माध्यमाने तिकीट रद्द करायचे असेल त्यांना प्रवासाच्या तारखेच्या 30 दिवस आगोदर कुठल्याही काउंटरवरून  रिफंड मिळवता येईल. सध्या रेल्वे रवाना होण्याच्या निर्धारित वेळेपर्यंत रिफंड मिळवता येत होता. 

भारतीय रेल्वेनने रविवारी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी 3700 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यात 2400 पॅसेंजर तर, 1300 लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे 4 ते रात्री 10 या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. 

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉरपोरेशनने (आयआरसीटीसी) 22 मार्चपासून खाण्यासंदर्भातील सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आला  रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. रेल्वेस्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद असेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्रpassengerप्रवासी