शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार पुन्हा देणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 12:30 IST

भारतीय रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमी असल्याची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली- रेल्वेतून निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेणार आहे. भारतीय रेल्वेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व बदल घडवण्याची इच्छा असणाऱ्या माजी कर्मचाऱ्यांना रेल्वे पुन्हा रूजू करून घेणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमी असल्याची बाब समोर आली आहे. या मागणीला पूर्ण करण्यासाठी रेल्वे निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. 1200 रूपये प्रती दिवस अशी रक्कम देऊन रेल्वेकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं जाणार आहे. कुठल्याही डिपार्टमेंट हेडकडे 10 माजी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे अधिकार आहेत. 

नियुक्त रेल्वे स्टाफ विविध झोनमध्ये असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कामात मदत करेल. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमित नियुक्तीपेक्षा वेगळी असेल म्हणजेच सध्या अस्तित्वात असेलल्या रिकाम्या जागेवर हे कर्मचारी नसतील. रेल्वेतील रिकाम्या जागांवर नियुक्त्या आधीप्रमाणेच सुरू राहतील. निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेताना रेल्वेने दोन अटी घालून दिल्या आहेत. 

दरम्यान, रेल्वेकडून सध्या मोठ्या प्रमाणात रूळांची दुरुस्ती व नवीन रूळ टाकण्याचं काम सुरू आहे. सोमवारी (18 जून) रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मोठी घोषणा केली. जर रविवारी रेल्वेला पाच-सहा तास उशिर होत असेल तर सर्व प्रवाशांना रेल्वेकडून मोफत जेवण दिलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेEmployeeकर्मचारी