शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तटरक्षक दलाकडून भारतीयांची सुटका; २ तास सुरु होता पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 20:42 IST

भारतीय मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेणाऱ्या जहाजावर भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली आहे.

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजावरुन दोन तासांच्या पाठलागानंतर सात भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे. पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीच्या पीएमएस नुसरत या जहाजावरुन मच्छिमारांना बळजबरीने अटक करून सीमेवर नेले जात होते. भारत आणि पाकिस्तान सीमेजवळून या मच्छिमारांना पकडण्यात आलं होतं. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाचा पाठलाग करुन भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे.

रविवारी पाकिस्तानी जहाज भारतीय मच्छिमारांना अटक करण्यासाठी पाकिस्तान-भारत सागरी सीमारेषेजवळ पोहोचले होते. मात्र तिथे तैनात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम नावाच्या जहाजाने तातडीने कारवाई करत पाकिस्तानी जहाजाचा दोन तास पाठलाग केला आणि मच्छिमारांची सुटका केली.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पीएमएस नुसरत जहाज हे कालभैरव या मासेमारीच्या बोटीतील मच्छिमारांना घेण्यासाठी भारतीय जलक्षेत्रात आले होते. भारतीय तटरक्षक दलाने तातडीने प्रत्युत्तर देत मच्छिमारांची सुटका केली. रविवारी दुपारी ३:३० वाजता, भारतीय तटरक्षक दलाच्या अग्रीम जहाजावर मदतीसाठी फोन आला होता. कालभैरव या भारतीय मासेमारी नौकेतून हा कॉल आला होता. कालभैरव जहाज नो-फिशिंग झोनजवळ मासेमारी करत होते. पाकिस्तानी जहाजाने त्यांना पकडून ठेवले होते. कालभेरववरच्या सात मच्छिमारांना पकडून पाकिस्तानात नेण्याचा पीएमएस नुसरत डाव होता.

पण अग्रीमने पूर्ण वेगाने जाऊन पाकिस्तानी जहाज नुसरतला रोखले. दोन तास समुद्रात शर्यत सुरू होती. यानंतर पाकिस्तानी जहाजाला भारतीय मच्छिमारांना सोडण्यास सांगण्यात आले. शेवटी धमक्या आणि समजूतदारपणा कामी आला. पण काळभैरव बोट तुटली. त्यामुळे ती समुद्रातच बुडाली.

यानंतर अग्रीम जहाज सोमवारी गुजरातमधील ओखा बंदरात मच्छिमारांसह परतले. या प्रकरणी आता गुप्तचर संस्था, राज्य पोलीस आणि तटरक्षक दल त्या मच्छिमारांची संयुक्तपणे चौकशी करत आहेत. याशिवाय समुद्रात नेमकं काय झालं याचाही तपास केला जात आहे.

टॅग्स :Gujaratगुजरातindian navyभारतीय नौदलPakistanपाकिस्तान