शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

रमजान संपताच ऑपरेशन ऑलआऊट सुरू; बांदिपुरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 12:12 IST

शस्त्रसंधी संपल्यानंतरची जवानांची पहिली धडक कारवाई

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी संपुष्टात येताच भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. शस्त्रसंधीमुळे हात बांधले गेलेल्या जवानांनी रमजान संपताच केलेल्या धडक कारवाईत चार दहशतवादी ठार झाले. शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिली कारवाई आहे. याशिवाय आज सकाळी जवानांनी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.सोमवारी सकाळी जवानांनी बांदिपुरात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. बांदिपुरात 14 जूनलादेखील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. या कारवाईत एका जवानाला वीरमरण आलं. आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना बिजबेहारा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. यानंतर या भागाला जवानांनी वेढा घातला. या भागात सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. 16 मे रोजी मोदी सरकारनं शस्त्रसंधी जाहीर करत दहशतवाद्यांविरोधातील कारवाई थांबवली. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र या काळात दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली. लष्कराचे जवान औरंगजेब यांचं अपहरण करुन दहशतवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली. याशिवाय रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता रमजान संपल्यानं लष्करानं पुन्हा दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिकTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद