शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे अपघात वाढले, लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 9:27 AM

दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - दुय्यम दर्जाचा दारुगोळा आणि युद्ध सामुग्रीमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत लष्कराने चिंता व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा दारुगोळा सरकारी मालकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डकडून लष्कराकडील रणगाडे, तोफा एअर डिफेन्स गन आणि अन्य युद्धसामुग्रीसाठी पुरवण्यात येतो. दरम्यान, दुय्यम दर्जाच्या दारुगोळ्यामुळे होत असलेल्या अपघातांमुळे चिंतीत असलेल्या लष्कराने याबाबत संरक्षण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. अशा दारुगोळ्यामुळे अपघात होऊन जवानांना प्राणास मुकत आहेत किंवा जायबंदी होत आहेत. तसेच युद्धसामुग्रीचेही नुकसान होत आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.  यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या वृत्तात असलेल्या उल्लेखानुसार सरकारी अधिपत्याखालील दारुगोळा कारखान्यांकडून पुरवण्यात येत असलेल्या दारुगोळ्यामुळे वाढत असलेल्या दुर्घटनांमुळे लष्कराचा या सामुग्रीवर असलेला विश्वास कमी झाला आहे. दारुगोळा कारखान्यांकडून दारुगोळ्याच्या दर्जाबाबत अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याने लष्कराने संरक्षण उत्पादन सचिव अजय कुमार यांच्याकडे गंभीर चिंता व्यक्त केली आहे.  वर्षाकाठी 19 हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाकडे दारुगोळा बनवणारे एकूण 41 कारखाने आहेत. हे कारखाने 12 लाख जवान सेवेत असलेल्या भारतीय लष्कराला दारुगोळ्याचा पुरवठा करणारे मुख्य स्रोत आहेत. या ऑर्डनन्स फॅक्टरीमधून उप्तादित दारुगोळ्याच्या दर्जात होत असलेल्या घसरणीचा देशाच्या युद्धक्षमतेवर परिणाम होतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान लष्कराकडून याबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर संरक्षण उत्पादन सचिव कुमार यांनी लष्कराला त्यांच्या विविध समस्या आपल्यासमोर मांडण्यास सांगितले आहे. 

 संरक्षण उत्पादन सचिवांना सादर केलेल्या 15 पानांच्या कागदपत्रांमध्ये लष्कराने अत्यंत गंभीर असे प्रश्न मांडले आहेत. 105 एमएमची इंडियन फिल्ड गन, 105 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम लाइट फिल्ड गन, 130 एमएम 1 मीडियम गन, 40 एमएम एल-70 एअर डिफेन्स गन,  टी-72, टी-90 आणि अर्जुन टँकच्या तोफांबाबत नियमित अपघात घडत आहेत. याशिवाय 155 एमएमच्या बोफोर्स तोफांबाबतही खराब दारुगोळ्याचे प्रकार घडले आहेत, असे लष्कराने संरक्षण उत्पादन सचिवांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ही समस्या सोडवण्यासाठी म्हणावे तेवढे गांभीर्य दाखवलेले नाही. त्यामुळे लष्कराने लांबपल्ल्याच्या दारुगोळ्याची फायरिंग थांबवली आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानDefenceसंरक्षण विभागIndiaभारत