शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

'भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही'; योगी आदित्यनाथांनी संभलबद्दल सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:29 IST

संभलमधील जामा मशि‍दीचा वाद देशभरात चर्चेत आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावर आता योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले आहे. 

Yogi Adityanath News: आमचा जुना वारसा परत मिळवणे ही वायफळ गोष्ट नाहीये, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संभलमधील वादावर मौन सोडले. ज्या मालमत्तांवर वक्फ बोर्डाकडून दावे केले जात आहेत, त्यावर योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संभलमधील शाही जामा मशि‍दीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा केला गेला. त्यामुळे कोर्टाने या मशि‍दीचे सर्वे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाद चिघळला. सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी असे मुद्दे आता काढू नये, असे म्हटले होते. त्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांनी भूमिका मांडली आहे. 

योगी आदित्यनाथ काय बोलले?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजतक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभलमधील जागेच्या वादावर भूमिका मांडली. 

आदित्यनाथ म्हणाले, "जुना वारसा परत मिळवणे, ही वाईट गोष्ट नाहीये. संभलमध्ये सनातन धर्माशी संबंधित अनेक पुरावे मिळाले आहेत. भारत आता मुस्लीम लीगच्या मानसिकतेने चालणार नाही."

शाही जामा मशि‍दीच्या सर्वे वेळी झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर जोर देत योगी आदित्यनाथ म्हणाले की, पुराणांमध्ये कल्किचे जन्मस्थान संभल सांगितले गेले आहे. कल्कि हा हिंदूंचे ईश्वर भगवान विष्णुंचा १०वा अवतार मानला जातो. 

'संभलमधील हरिहर मंदिर पाडून...'

"वर्ष १५९६ मध्ये संभलमध्ये एक हरिहर मंदिर तोडून, एक बांधकाम करण्यात आले होते. त्याचा उल्लेख आइन ए अकबरी असाही केलेला आहे", असे योगी आदित्यनाथ म्हणाले. 

काही दिवसांपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर-मशीद मुद्दे आता उचलू नयेत, असे म्हटले होते. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी अयोध्येमध्ये राम मंदिर झाले. ती सर्वांची इच्छा होती. पण, दररोज असे नवीन मुद्दे उकरून काढणे स्वीकारार्ह नाही, असे मत त्यांनी मांडले होते. त्यानंतर आता योगींनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशMosqueमशिदRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ