शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 08:29 IST

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही

ठळक मुद्देसीएएमुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व जाणार नाही६०० मुस्लिम बांधवांना जे पाकिस्तानातून आलेत त्यांना ५ ते ६ वर्षांत भारताचं नागरिकत्व दिलेभारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले. 

निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारने गेल्या ५ ते ६ वर्षात ६०० पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं आहे. तसेच सीएएच्या विरोधामागील आंदोलनात परदेशी शक्तींचा हात असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आम्ही हिंदू-मुस्लिमांच्या जोरावर राजकारण करणारे लोक नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामी देश आहेत.

पण भारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही. पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लीम लोकांवर धार्मिक अत्याचार होतात, म्हणून आम्हाला हा कायदा करण्याची आवश्यकता होती. मग ते हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी असतील, तिथे त्यांच्यावर धार्मिक अत्याचार केले जात आहे आणि भारतात त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना नागरिकत्व देऊ. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात

मुस्लिमांनाही नागरिकत्वाची तरतूदमुस्लीम समाजाचा प्रश्न आहे. जर कोणताही मुस्लीम बांधव ज्याला पाकिस्तानातून यायचे असेल, भारतात राहायचे असेल तर त्यांना आमच्या नागरिकत्व कायद्यात तरतूद आहे की त्यांना येथे नागरिकत्व मिळू शकेल. आम्ही आमच्या ६०० मुस्लिम बांधवांना जे पाकिस्तानातून आले आहेत त्यांना ५ ते ६ वर्षांत भारताचं नागरिकत्व दिले आहे. तरीही द्वेष भडकावण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. 

परदेशी शक्तींचा हात सीएएमुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली. सीएएच्या विरोधामागील परदेशी शक्तींचा हात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. केवळ दिशाभूल केली जात आहे. यामध्ये काही परदेशी शक्तींचा सहभाग आहे. इतिहास द्वेषाच्या शाईने लिहिण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही संरक्षणमंत्र्यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

Jamia Protest: मोदीजी, 'त्याला' त्याच्या कपड्यांवरुन ओळखा; ओवेसींचा चिमटा

Jamia Protest: शाहीन बाग, खेल खत्म; त्यानं फेसबुकवर दिले होते गोळीबाराचे संकेत

Jamia Firing : आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी 'तो' होता फेसबुकवर LIVE

'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'

देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहMuslimमुस्लीमHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारत