शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'आत्मनिर्भर भारत की अमेरिका निर्भर...?' व्यापार करारावरून काँग्रेसने केंद्रावर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 18:21 IST

India US Trade Deal: भारत आणि अमेरिकेत झालेल्या व्यापार करारावर काँग्रेसने तीव्र टीका केली आहे.

India US Trade Deal: भारत आणि अमेरिकेत झालेल्या व्यापार करारावर (Trade Deal) काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवत हा करार भारतीय शेतकरी, ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटल स्वातंत्र्यासाठी घातक असल्याचा आरोप केला आहे. तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या सरकारच्या घोषणेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आत्मनिर्भर भारत की अमेरिका-निर्भर भारत?

सुरजेवाला म्हणाले की, या ट्रेड डीलमुळे भारत हळूहळू अमेरिकेवर अवलंबून होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. मोदी सरकारने या करारात शेतकरी आणि शेतीजमिनीच्या मालकांच्या हितांचा बळी दिला आहे. ते पुढे म्हणाले, डिजिटल स्वातंत्र्य आणि डेटा प्रायव्हसीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय हितांचे संरक्षण मजबूत करण्याऐवजी, सरकारने देशाच्या स्वातंत्र्याशी आणि डेटा सुरक्षेशी तडजोड केली आहे. मग ही मजबूत सरकार आहे की कमकुवत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ही डील लोकांची रोजीरोटी उद्ध्वस्त करेल

रणदीप सुरजेवाला यांनी या कराराचे आर्थिक परिणाम अधोरेखित करत म्हटले की, अमेरिकेतील प्रोसेस्ड फळे आणि इतर अ‍ॅडिशनल उत्पादनांसाठी भारतीय बाजार खुले केल्यास, देशातील लाखो लोकांची रोजीरोटी उद्ध्वस्त होईल. त्यांनी असेही नमूद केले की, सध्या 334 मिलियन डॉलरच्या कापसाच्या आयातीमुळे देशांतर्गत किमती घसरल्या आहेत. यानंतर दूध, गहू आणि दुग्धजन्य पदार्थांनाही झिरो टॅरिफ सवलतीत समाविष्ट केले जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

परराष्ट्र मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्न

सुरजेवाला यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या उत्तरावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भारत-अमेरिका ट्रेड डीलबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्री म्हणतात की, हा विषय दुसऱ्या विभागाचा आहे. जर परराष्ट्र मंत्र्यांनाच या कराराची पूर्ण माहिती नसेल, तर अशा उत्तरावर देशाने समाधान मानावे का? असा प्रश्नही सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress questions if 'Self-Reliant India' is becoming 'America-Reliant India'.

Web Summary : Congress criticizes the India-US trade deal, alleging it harms farmers, energy security, and digital freedom. Randeep Singh Surjewala questions the government's 'Self-Reliant India' initiative, suggesting increasing dependence on the US and compromising data security.
टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाAmericaअमेरिकाIndiaभारतbusinessव्यवसाय