शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

भारत सरकारच्या रणनीतीनं पाकिस्तानची झोप उडाली; तालिबानशी जवळीक डोकेदुखी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:04 IST

भारत आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या बैठका धोकादायक आहेत. या बैठकीत टीटीपी आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानी एअर स्ट्राईकवर चर्चा झाली

नवी दिल्ली - २०२१ साली तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सर्वात जास्त आनंदी पाकिस्तान झाला होता. इस्लामिक देश असल्याने पाकिस्तानला फायदा होण्याची आशा होती परंतु अवघ्या ३ वर्षात परिस्थिती पूर्ण बदलली आहे. पाकिस्तान आणि तालिबानी राजवटीच्या अफगाणिस्तानाचे संबंध दिवसेंदिवस खराब होत चाललेत. तालिबान शेजारील राष्ट्र पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशांसोबत संबंध बनवत आहे. सध्या तालिबानचा सर्वात मोठा मित्र म्हणून भारत पुढे येत आहे.

अलीकडेच भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांच्यासोबत दुबईत बैठक घेतली. या बैठकीनंतर तालिबानने भारताला एक चांगला सहकारी असल्याचं म्हटलं. त्याशिवाय तालिबान मंत्र्‍याने युएईचे मंत्री अब्दुल्ला बिन जायद अल नाहयान यांचीही भेट घेतली. तालिबानने या भेटीतून पाकिस्तानाला दाखवून दिले की, इस्लामिक देशांमध्ये पाकिस्तानशिवायही त्याचे अनेक मित्र आहेत. 

भारत-तालिबानची जवळीक बनली डोकेदुखी

UAE आणि सौदीला तालिबानने भेटणे पाकिस्तानसाठी चिंताजनक नाही परंतु भारत आणि तालिबान यांच्यातील जवळीक पाकिस्तानी तज्ज्ञांसाठी चिंतेची वाटते. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करतात त्याशिवाय पाकिस्तानला सतर्कतेचा इशारा देतात. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार जाण्यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचं नाव येत आहे. त्यातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. तालिबानसोबत भारत सुरुवातीपासून संपर्कात आहे. ते मोफत गहु, औषधे आणि पोलिओ व्हॅक्सिन तालिबानला देतायेत असं पाकिस्तानी तज्ज्ञांनी सांगितले.

त्याशिवाय भारत आणि तालिबान यांच्यात होणाऱ्या बैठका धोकादायक आहेत. या बैठकीत टीटीपी आणि अफगाणिस्तानवर पाकिस्तानी एअर स्ट्राईकवर चर्चा झाली. भारताने इराणच्या चाबहार बंदर विकासावर मदतीचं आश्वासन दिले आहे. भारताला मॅनेज करणे आवश्यक आहे कारण पाकिस्तानबाबत त्यांचे धोरण आक्रमक आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या जमिनीवर एअर स्ट्राईक केले होते ज्यामुळे त्यांचे तालिबानशी संबंध खराब झाले आहेत. भारत काश्मीरवर चर्चा करू इच्छित नाही परंतु अफगाणिस्तानसोबत आपल्याला नवीन धोरण आखायला हवे असं पाकिस्तानी तज्ज्ञांनी म्हटलं.

दरम्यान, भारत अफगाणिस्तानात चीनचा वाढता प्रभाव कमकुवत करण्यासाठी तालिबानच्या जवळ जात आहे. टीटीपी आणि इस्लामिक स्टेट मिळून अफगाणिस्तानात गृहयुद्धाची परिस्थिती बनवू शकतात अशी भीती अफगाण तालिबान्यांना आहे. त्यासाठी ते टीटीपीविरोधात थेट एक्शन घेत नाहीत ज्यातून पाकिस्तानला संधी मिळेल. तालिबान केवळ आपले सरकार वाचवत आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. भारताला हीच संधी आहे. त्यातच भारत जवळ आल्यानं पाकिस्तानवर वचक ठेवता येईल त्यामुळे तालिबानही भारताशी जवळीक वाढवत आहे असं पाकिस्तानी परराष्ट्र धोरणाचे तज्त्र नजम सेठी यांनी सांगितले. 

टॅग्स :IndiaभारतTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान