शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Coronavirus: आता देशांतर्गत विमान उड्डाणंही बंद; कोरोनाला रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 6:09 PM

Coronavirus कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय; उद्या रात्रीपासून अंमलबजावणी

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशांतर्गत हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मंगळवारी (उद्या) रात्री १२ वाजल्यापासून देशातील हवाई उड्डाणं बंद होतील. त्यामुळे उद्या रात्री १२ च्या आधी विमानं विमानतळांवर उतरतील, अशा प्रकारची योजना विमान कंपन्यांना आखावी लागेल. सरकारनं याआधीच रेल्वे वाहतूक रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात दररोज जवळपास ६५०० विमानांची उड्डाणं होतात. ही उड्डाणं देशांतर्गत स्वरुपाची असतात. यामधून वर्षाकाठी १४४.१७ मिलियन प्रवासी प्रवास करतात. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत हवाई उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशात आतापर्यंत कोरोनाचे चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० नं वाढलाय. दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. तर उत्तर प्रदेशमधल्या १६ जिल्ह्यांमध्ये २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलंय. महाराष्ट्रातही जमावबंदीपाठोपाठ संचारबंदी लागू करण्यात आलीय. देशातील प्रवासी रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय कालच मोदी सरकारनं घेतला. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच्या सर्व प्रवासी गाड्या रेल्वे मंत्रालयानं रद्द केल्या आहेत. त्यामुळे एक्स्प्रेस, पॅसेंजर, इंटरसिटी अशा सर्व गाड्या बंद आहेत. सध्या केवळ मालगाड्या सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांसोबतच लोकल गाड्यादेखील बंद केल्या गेल्या आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या