शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारत सज्ज- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 05:25 IST

अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती.

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये सीमातंट्यासह आणखी काही मुद्यांवर मतभेद आहेत, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे चीनचे जवान भारतीय हद्दीत आणि भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत जाण्याचे प्रकार घडतात. ती प्रत्यक्ष घुसखोरी नसते. मात्र, भारताची सैन्यदले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या देशाच्या सीमा अत्यंत सुरक्षित आहेत, असे संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती. सतर्क असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला पिटाळून लावले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, सीमेच्या अगदी जवळच्या भागात चिनी लष्कराप्रमाणेच भारतीय सैन्यातले जवानही गस्त घालत असतात. डोकलाम येथे चीनने वाहनयोग्य रस्ता बांधायला घेतल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी जून २०१७ मध्ये जोरदार आक्षेप घेतला होता.मोठा भूभाग बळकावला१९६७ साली सिक्कीमच्या नथू ला खिंडीत घडलेली चकमक वगळता भारत व चीनने त्यानंतर परिस्थिती फार चिघळणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. चीन अधूनमधून कुरापती काढत असतो.भारताला शत्रू मानणाºया पाकिस्तानला आर्थिक मदत करून चीनने त्यालाही वश करून घेतले आहे.राजनाथसिंह म्हणाले की, भारत व चीन आपसातील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करतील. १९६२ साली चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह