शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारत सज्ज- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 05:25 IST

अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती.

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये सीमातंट्यासह आणखी काही मुद्यांवर मतभेद आहेत, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे चीनचे जवान भारतीय हद्दीत आणि भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत जाण्याचे प्रकार घडतात. ती प्रत्यक्ष घुसखोरी नसते. मात्र, भारताची सैन्यदले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या देशाच्या सीमा अत्यंत सुरक्षित आहेत, असे संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती. सतर्क असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला पिटाळून लावले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, सीमेच्या अगदी जवळच्या भागात चिनी लष्कराप्रमाणेच भारतीय सैन्यातले जवानही गस्त घालत असतात. डोकलाम येथे चीनने वाहनयोग्य रस्ता बांधायला घेतल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी जून २०१७ मध्ये जोरदार आक्षेप घेतला होता.मोठा भूभाग बळकावला१९६७ साली सिक्कीमच्या नथू ला खिंडीत घडलेली चकमक वगळता भारत व चीनने त्यानंतर परिस्थिती फार चिघळणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. चीन अधूनमधून कुरापती काढत असतो.भारताला शत्रू मानणाºया पाकिस्तानला आर्थिक मदत करून चीनने त्यालाही वश करून घेतले आहे.राजनाथसिंह म्हणाले की, भारत व चीन आपसातील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करतील. १९६२ साली चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह