शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास भारत सज्ज- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 05:25 IST

अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती.

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये सीमातंट्यासह आणखी काही मुद्यांवर मतभेद आहेत, तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेमुळे चीनचे जवान भारतीय हद्दीत आणि भारतीय सैनिक चीनच्या हद्दीत जाण्याचे प्रकार घडतात. ती प्रत्यक्ष घुसखोरी नसते. मात्र, भारताची सैन्यदले कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. आपल्या देशाच्या सीमा अत्यंत सुरक्षित आहेत, असे संरक्षणमंंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.अंदमान-निकोबार बेटाजवळच्या समुद्रात भारताच्या विशेष आर्थिक विभागामध्ये चीनच्या एका जहाजाने नुकतीच घुसखोरी केली होती. सतर्क असलेल्या भारतीय नौदलाने या जहाजाला पिटाळून लावले. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधिररंजन चौधरी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला राजनाथसिंह उत्तर देत होते. ते म्हणाले, सीमेच्या अगदी जवळच्या भागात चिनी लष्कराप्रमाणेच भारतीय सैन्यातले जवानही गस्त घालत असतात. डोकलाम येथे चीनने वाहनयोग्य रस्ता बांधायला घेतल्यानंतर त्याला भारतीय सैनिकांनी जून २०१७ मध्ये जोरदार आक्षेप घेतला होता.मोठा भूभाग बळकावला१९६७ साली सिक्कीमच्या नथू ला खिंडीत घडलेली चकमक वगळता भारत व चीनने त्यानंतर परिस्थिती फार चिघळणार नाही याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. चीन अधूनमधून कुरापती काढत असतो.भारताला शत्रू मानणाºया पाकिस्तानला आर्थिक मदत करून चीनने त्यालाही वश करून घेतले आहे.राजनाथसिंह म्हणाले की, भारत व चीन आपसातील मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करतील. १९६२ साली चीनने भारताचा मोठा भूभाग बळकावला आहे याचीही आठवण त्यांनी करून दिली.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह