शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधये 47, केरळमध्ये 27 तर नेपाळमध्ये 21 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 11:41 IST

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो.

ठळक मुद्दे केरळमध्ये 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंड आणि नेपाळमधील पावसामुळे यूपीतील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार माजलाय. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे झालेल्या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला. बहुतेक मृत्यू ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झाले आहेत. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. तर, तिकडे केरळमध्येही विविध घटनांमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 27 जणांचा मृत्यू

केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राज्यात 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% अधिक पाऊस झाला आहे. साधारणपणे, या काळात 192.7 मिमी पाऊस पडतो, परंतु यावर्षी 453.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

केरळच्या 11 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाने आज तिरुअनंतपुरम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूरसह राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कासारगोड, अलप्पुझा आणि कोल्लममध्ये पिवळा इशारा सुरू आहे. 21 ऑक्टोबर रोजी कन्नूर आणि कासारगोड वगळता सर्व जिल्ह्यांसाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातही अलर्ट जारीउत्तराखंड आणि नेपाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. लखीमपूर खेरी, सीतापूर आणि बाराबंकीमध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. वास्तविक, उत्तराखंडमधून बनबसा बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कोसी नदीने रामपूर परिसरात कहर सुरू केला आहे. नदीलगतच्या डझनभर गावांना पुराचा धोका आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

नेपाळमध्येही पावसामुळे 21 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसाचा फटका नेपाळलाही बसला आहे. पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील 19 जिल्हे पूर आणि भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले आहेत. देशात मान्सून हंगाम आधीच संपला होता, परंतु हवामानात अचानक बदल झाला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसUttarakhandउत्तराखंडUttar Pradeshउत्तर प्रदेशKeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरNepalनेपाळ