शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आणि भूस्खलनामुळे उत्तराखंडमधये 47, केरळमध्ये 27 तर नेपाळमध्ये 21 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 11:41 IST

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की, 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो.

ठळक मुद्दे केरळमध्ये 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% जास्त पावसाची नोंद झाली आहे. उत्तराखंड आणि नेपाळमधील पावसामुळे यूपीतील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे उत्तराखंड आणि केरळमध्ये हाहाकार माजलाय. मंगळवारी उत्तराखंडमध्ये पूर आणि पावसामुळे झालेल्या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला. बहुतेक मृत्यू ढगफुटी आणि भूस्खलनामुळे झाले आहेत. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. तर, तिकडे केरळमध्येही विविध घटनांमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 27 जणांचा मृत्यू

केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे किमान 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचेही वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, राज्यात 1 ते 19 ऑक्टोबर दरम्यान 135% अधिक पाऊस झाला आहे. साधारणपणे, या काळात 192.7 मिमी पाऊस पडतो, परंतु यावर्षी 453.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

केरळच्या 11 जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट

आयएमडीने अंदाज वर्तवला आहे की 20 ऑक्टोबरपासून केरळच्या अनेक भागात तीन दिवस पाऊस सुरू राहू शकतो. हवामान विभागाने आज तिरुअनंतपुरम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड आणि कन्नूरसह राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कासारगोड, अलप्पुझा आणि कोल्लममध्ये पिवळा इशारा सुरू आहे. 21 ऑक्टोबर रोजी कन्नूर आणि कासारगोड वगळता सर्व जिल्ह्यांसाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

उत्तर प्रदेशातही अलर्ट जारीउत्तराखंड आणि नेपाळमधील मुसळधार पावसाचा परिणाम आता उत्तर प्रदेशातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. लखीमपूर खेरी, सीतापूर आणि बाराबंकीमध्ये पुराचा इशारा जारी करण्यात आला आहे. नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. वास्तविक, उत्तराखंडमधून बनबसा बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कोसी नदीने रामपूर परिसरात कहर सुरू केला आहे. नदीलगतच्या डझनभर गावांना पुराचा धोका आहे. प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

नेपाळमध्येही पावसामुळे 21 जणांचा मृत्यू

मुसळधार पावसाचा फटका नेपाळलाही बसला आहे. पुरामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 24 लोक बेपत्ता आहेत. नेपाळच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील 19 जिल्हे पूर आणि भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले आहेत. देशात मान्सून हंगाम आधीच संपला होता, परंतु हवामानात अचानक बदल झाला आहे.

 

टॅग्स :RainपाऊसUttarakhandउत्तराखंडUttar Pradeshउत्तर प्रदेशKeralaकेरळKerala Floodsकेरळ पूरNepalनेपाळ