शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 23:42 IST

Operation Sindoor: केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानधून वाहणाऱ्या नदीचे पाणी मिळणेही पाकिस्तानला दुरापास्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण कसे?

Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एकामागून एक पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानला जागा दाखवून दिली. यानंतर युद्धविराम झाल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच राहिल्या. भारताने यालाही चोख उत्तर दिले. या घडामोडींनंतरही सिंधू नदी जल वाटप करार स्थगितच राहणार असल्याचे भारताने स्पष्ट केले. परंतु, याचा मोठा परिणाम पाकवर होणार असल्याने या निर्णयावर पुनर्विचार करावा, यासाठी भारताला विनंती करण्यात आली आहे. यातच आता केवळ सिंधू नदी नाही, तर अफगाणिस्तानमधून वाहणाऱ्या काबूल नदीचे पाणीही पाकिस्तानला मिळू शकणार नाही, असे सांगितले जात आहे. 

अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये अनेक मुद्द्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयशंकर आणि मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानात भारताच्या मदतीने सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना पुढे नेण्यास सहमती दर्शविली, ज्यामध्ये काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या लालंदरमधील शाहतूत धरण प्रकल्पाचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि अफगाणिस्तानमध्ये याबाबत एक करार झाला होता. सत्ताबदलामुळे त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. परंतु, या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, असे समजते.

२० लाख लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल

काबूल नदीवर बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि परिसरात राहणाऱ्या सुमारे २० लाख लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. या धरण प्रकल्पासाठी भारत आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देणार आहे. सुमारे तीन वर्षांत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पात अफगाणिस्तानातील ४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. हा प्रकल्प पूर्णत्वास केल्यास पाकिस्तानसाठी आणखी कठीण परिस्थिती होईल, असे म्हटले जात आहे. कारण, या प्रकल्पामुळे काबूल नदीचे पाणी अडवले जाणार आहे. 

पाकचा अफगाणिस्तानशी कोणताही औपचारिक जल करार नाही

या प्रकल्पात काबूल नदीची भौगोलिक स्थिती पाकिस्तानसाठी अडचणीचे कारण आहे. ही नदी हिंदकुश पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवेश करते. हा प्रकल्प झाला की, पाकिस्तानला सर्वांत मोठा आणि थेट धोका पोहोचणार आहे. कारण खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करणे पाकिस्तानला कठीण होणार आहे. काबूल नदी ही सिंधू नदीच्या खोऱ्याचा भाग आहे आणि पाकिस्तानसाठीही ती खूप महत्त्वाची आहे. अफगाणिस्तानशी कोणताही औपचारिक जल करार नसल्यामुळे पाकच्या चिंतेच भर पडू शकते, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. याबाबत त्यांचा मनापासून आभारी आहे. खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव असल्याच्या दाव्यांना त्यांनी ठामपणे नकार दिला. या गोष्टीचे स्वागत आहे. तसेच या चर्चेत अफगाणिस्तानातील जनतेसोबतची आपली पारंपारिक मैत्री आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी सतत पाठिंबा देण्यावर भर दिला. दोन्ही देशांतील सहकार्य पुढे नेण्याबाबतही चर्चा झाली, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान