शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 08:35 IST

रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेत भारताने पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. रात्री अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. मात्र हा एअर स्ट्राइक रात्री दीड वाजताच का करण्यात आला याबाबतचा खुलासा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केला आहे. रांची येथील एका शाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी जनरल अनिल चौहान म्हणाले की, ७ मे रोजी रात्री १ ते दीड या काळात दहशतवादी तळांवर पहिला स्ट्राइक करण्यात आला होता. ही वेळ निवडण्यासाठी २ कारणे होती. पहिले कारण म्हणजे, सैन्याला त्यांच्या तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विश्वास होता. रात्रीही ते इमेजरी अथवा सॅटेलाईट फोटो घेऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांचा जीव वाचवणे. जर ही स्ट्राइक पहाटे ५.३०-६ च्या सुमारास झाली असती तर ही पहिल्या नमाजाची वेळ होती. त्यामुळे बहावलपूर, मुरिदके येथे बहुसंख्य नागरिक नमाजासाठी घराबाहेर पडले असते. त्यात नागरिकांना नुकसान होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मध्यरात्री १ ते दीड च्या काळात स्ट्राइक करण्यात आले असं त्यांनी सांगितले. 

तसेच रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. तंत्रज्ञान, सिग्नल इंटेलिजेंस, इमेजरी चांगली हवी. ही रणनीती ना सैन्याचा धोका कमी करण्यासाठी गरजेचे होती तर नागरिकांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची होती. सैन्य केवळ ताकद नाही, तर प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि देशभक्तीचं प्रतीक आहे असंही जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. 

दरम्यान, सैन्य ही फक्त अशी जागा आहे जिथे नेपोटिज्म होत नाही. जिथे व्यक्तीची पात्रता केवळ कामावर ठरते, ना कुठल्याही कनेक्शन अथवा संबंधाशिवाय..यावर्षी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकट आली. त्यात सैन्याने नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जागरूक करण्याचं काम युवकांनी केले पाहिजे असं आवाहन जनरल चौहान यांनी तरुणांना केले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादी