शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 08:35 IST

रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले असं सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं.

नवी दिल्ली - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेत भारताने पाकिस्तानातीलदहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. रात्री अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली. मात्र हा एअर स्ट्राइक रात्री दीड वाजताच का करण्यात आला याबाबतचा खुलासा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केला आहे. रांची येथील एका शाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी जनरल अनिल चौहान म्हणाले की, ७ मे रोजी रात्री १ ते दीड या काळात दहशतवादी तळांवर पहिला स्ट्राइक करण्यात आला होता. ही वेळ निवडण्यासाठी २ कारणे होती. पहिले कारण म्हणजे, सैन्याला त्यांच्या तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विश्वास होता. रात्रीही ते इमेजरी अथवा सॅटेलाईट फोटो घेऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथल्या सामान्य नागरिकांचा जीव वाचवणे. जर ही स्ट्राइक पहाटे ५.३०-६ च्या सुमारास झाली असती तर ही पहिल्या नमाजाची वेळ होती. त्यामुळे बहावलपूर, मुरिदके येथे बहुसंख्य नागरिक नमाजासाठी घराबाहेर पडले असते. त्यात नागरिकांना नुकसान होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे मध्यरात्री १ ते दीड च्या काळात स्ट्राइक करण्यात आले असं त्यांनी सांगितले. 

तसेच रात्रीच्या वेळीही इतक्या लांब अंतरावरील टार्गेटवर प्रिसिजन स्ट्राइक केला जाऊ शकतो हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. तंत्रज्ञान, सिग्नल इंटेलिजेंस, इमेजरी चांगली हवी. ही रणनीती ना सैन्याचा धोका कमी करण्यासाठी गरजेचे होती तर नागरिकांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाची होती. सैन्य केवळ ताकद नाही, तर प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि देशभक्तीचं प्रतीक आहे असंही जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं. 

दरम्यान, सैन्य ही फक्त अशी जागा आहे जिथे नेपोटिज्म होत नाही. जिथे व्यक्तीची पात्रता केवळ कामावर ठरते, ना कुठल्याही कनेक्शन अथवा संबंधाशिवाय..यावर्षी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकट आली. त्यात सैन्याने नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी जागरूक करण्याचं काम युवकांनी केले पाहिजे असं आवाहन जनरल चौहान यांनी तरुणांना केले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारतterroristदहशतवादी