दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:55 IST2025-06-08T10:55:27+5:302025-06-08T10:55:52+5:30
India-Pakistan: 'आम्ही दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीचे पालन करतो. आमच्या मित्र राष्ट्रांनीही हे समजून घ्यावे.'

दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
India-Pakistan: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. आधी भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. त्यानंतर सरकार विविध देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणत आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी ब्रिटिश परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी झालेल्या बैठकीत म्हणाले की, भारत कधीही दहशतवादी आणि पीडितांना एक माणणार नाही.
गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या ४ दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर अनेक देशांनी भारत आणि पाकिस्तानला पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत डॉ. एस जयशंकर यांचे हे विधान महत्वाचे ठरते.
डेव्हिड लॅमी पीएम मोदींना भेट घेतले
ब्रिटिश परराष्ट्र सचिव लॅमी काल सकाळी दिल्लीत पोहोचले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ब्रिटिश परराष्ट्रमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय कारवाईची गरज असल्याचे म्हटले. तसेच, सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत ब्रिटनने दिलेल्या पाठिंब्याचे मी कौतुकही केले.
Pleased to meet UK Foreign Secretary Mr. David Lammy. Appreciate his substantive contribution to the remarkable progress in our Comprehensive Strategic Partnership, further strengthened by the recently concluded FTA. Value UK’s support for India’s fight against cross-border… pic.twitter.com/8PDLWEwyTl
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2025
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदींनी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार आणि दोन्ही देशांमधील दुहेरी योगदान करार (डीसीसी) च्या अलिकडच्या निष्कर्षाला "रणनीतिक टप्पा" म्हटले आहे. यामुळे विविध क्षेत्रात भागीदारीच्या शक्यता उघडतील. पंतप्रधान मोदींनी ब्रिटिश समकक्ष पंतप्रधान केयर स्टारमर यांना शुभेच्छा दिल्या आणि शक्य तितक्या लवकर भारताला भेट देण्याचे आमंत्रणदेखील दिले.
एफटीए दोन्ही देशांसाठी एक नवीन सुरुवात
परराष्ट्र मंत्री लॅमी यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला पाठिंबा दिल्याबद्दल ब्रिटनचे आभार मानले. जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, आम्ही दहशतवादाविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'चे धोरण पाळतो आणि आशा करतो की, आमचे मित्र राष्ट्र हे चांगल्या प्रकारे समजून घेतील. जयशंकर यांनी अलिकडेच झालेल्या भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (एफटीए) आणि दुहेरी योगदान कराराचेही मैलाचे दगड म्हणून वर्णन केले.