शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मानव विकास निर्देशांकात भारत एका पायरीने वर; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 1:42 AM

१८९ देशांत भारत १२९ व्या स्थानावर

नवी दिल्ली : भारत २०१९ वर्षामध्ये मानव विकास निर्देशांकात (एचडीआय) १८९ देशांत एक पायरी वर चढून १२९ व्या स्थानी आला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात म्हटले आहे.

गेल्यावर्षी भारताचे हे निर्देशांक मूल्य ०.६४७ होते व त्यामुळे भारत १३० व्या स्थानी होता. २००५-२००६ ते २०१५-२०१६ या कालावधीत भारतात दारिद्र्यातून २७.१ कोटी लोकांना वर काढण्यात आले, असे यूएनडीपीच्या भारताच्या निवासी प्रतिनिधी शोको नोदा यांनी हा अहवाल (बियोंड इन्कम, बियोंड अ‍ॅव्हरेजेस, बियोंड टुडे : इनइक्वालिटिज इन ह्यूमन डेव्हलपमेंट इन द टष्ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी) प्रकाशित करताना म्हटले.

या कालावधीत संपूर्ण दारिद्र्यात नाट्यमय घट झाली, त्याचसोबत जीवनमान, शिक्षण वाढले आणि आरोग्यसेवा उपलब्ध झाली. या निर्देशांकानुसार मानव विकासाच्या प्रगतीत इतर कोणत्याही प्रांताचा असा अनुभव नाही, असे त्या म्हणाल्या.१९९० ते २०१८ या कालावधीत दक्षिण आशियाची वेगाने (४६ टक्के) वाढ झाली. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिकची ४३ टक्क्यांनी वाढ झाली.

तीन दशकांपासून वेगाने विकास

भारताने विकासासाठी आर्थिक समावेशन (प्रधानमंत्री जन धन योजना), सर्वांसाठी आरोग्य सेवा (आयुष्मान भारत) आदींत घेतलेला पुढाकार हा कोणीही मागे राहू नये आणि पंतप्रधानांचा सर्वांसाठी विकास हा दृष्टिकोन साकारण्याचे जे आश्वासन दिले गेले होते ते पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे होते, असे शोको नोदा म्हणाल्या. त्यांनी म्हटले की, भारताची सतत सुरू असलेली प्रगती ही जवळपास तीन दशकांच्या वेगाने झालेल्या विकासामुळे आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत