शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 18:26 IST

India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या 6 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती.

India On Pakistan: पाकिस्तानीतुरुंगात कैद असलेल्या भारतीयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 9पाकिस्तानमध्ये कैद असलेल्या 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती, पण पाकिस्ताननेत्यांना बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. 

आज माध्यमांशी संवाद साधताना अरिंदम बागची म्हणाले, "पाकिस्तानी तुरुंगात भारतीय कैद्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनकआहे. गेल्या 9 महिन्यांत 6 भारतीयांनी पाकिस्तानच्या ताब्यात आपले प्राण गमावले आहेत, त्यापैकी 5 मच्छिमार होते. चिंतेचीबाब म्हणजे या सर्व 6 जणांची शिक्षा पूर्ण झाली होती. इस्लामाबादमधील आमच्या उच्चायुक्ताने भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. सर्व भारतीय कैद्यांची तात्काळ सुटका करून त्यांना भारतात पाठवावे, असे आवाहन पाकिस्तान सरकारला करण्यात आले आहे.'' पत्रकार परिषदेत त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरही भाष्य केले. 

चीन आणि म्यानमारचे काय?अरिंदम बागची म्हणाले, एलएसीवरील डिसइंगेजमेंटसाठी आवश्यक पावले अद्याप सुरू नाहीत. परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत, पण काही पावले अजून बाकी आहेत. म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे 50 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतjailतुरुंगDeathमृत्यूPrisonतुरुंग