शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 12:38 IST

हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे.

ठळक मुद्देनेपाळने भारताशी असलेला संघर्ष आणखी वाढवण्याचं जवळपास निश्चित केलेलं दिसतंय.पहिल्यांदा आपल्या अधिकृत नकाशामध्ये भारताची क्षेत्रे दाखवली आणि आता 12 वर्षांनंतर भारतीय सीमेवरील रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे. धारचुला-टिनकर या 130 किमीच्या रस्त्याच्या भागातील 50 किलोमीटरचा रस्ता हा उत्तराखंडशी जोडलेला आहे.

काठमांडूः नेपाळनेभारताशी असलेला संघर्ष आणखी वाढवण्याचं जवळपास निश्चित केलेलं दिसतंय. पहिल्यांदा आपल्या अधिकृत नकाशामध्ये भारताची क्षेत्रे दाखवली आणि आता 12 वर्षांनंतर भारतीय सीमेवरील रस्त्याचं काम पुन्हा सुरू केलं आहे. हा रस्ता उत्तराखंडमधील धारचुला गावातून जातो. धारचुला-टिनकर या 130 किमीच्या रस्त्याच्या भागातील 50 किलोमीटरचा रस्ता हा उत्तराखंडशी जोडलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकल्पाला 2008 मध्ये परवानगी देण्यात आली होती. हा रस्ता बनवण्यामागे टिनकर खिंडीतून नेपाळ आणि चीनमधील व्यापारास चालना देण्याचा हेतू आहे. या रस्त्याचा उर्वरित भाग आता नेपाळ आर्मी पूर्ण करणार आहे.नेपाळला हा रस्ता आताच का आठवला?नेपाळला हा रस्ता आताच का आठवला असेल, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. पण त्याला कारणही तसंच आहे. 8 मे रोजी धारचुला ते लिपुलेख खिंडीला जोडणार्‍या 80 किमी लांबीच्या रस्त्याचे भारताने उद्घाटन केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तवाघाट-लिपुलेख मार्गाचे उद्घाटन झाले. कैलास मानसरोवराला भेट देण्यासाठी या रस्त्यामुळे कमी वेळ लागेल, असे त्यांनी म्हटले होते.ठेकेदार काम सोडून पळाला होताहा रस्ता गेल्या 12 वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. याचा केवळ 43 किमीचा रस्ता तयार झाला होता. इथला भूभाग हा अत्यंत धोकादायक तर आहेच, पण हवामानाचाही भरवसा नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी रस्ता तयार करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे तोटा वाढत होता, त्यामुळे कंत्राटदारही काम सोडून पळून गेला होता. नेपाळ सरकारचा असा विश्वास आहे की, या रस्त्याच्या बांधकामामुळे केवळ व्यापारच वाढणार नाही, तर यात्रेकरू आणि पर्यटकांची संख्याही वाढेल.नेपाळ आर्मी तयार करत आहे बेस कॅम्प भारताने धारचुला-लिपुलेक रस्ता खुला केला, तेव्हा नेपाळमध्ये जोरदार विरोध झाला. तेथील सरकारने सांगितले की, हा पास नंतर नेपाळच्या हद्दीत येतो. हा रस्ता पूर्णपणे भारतीय हद्दीत असल्याचे भारताने स्पष्ट केले होते. नेपाळला हरकत होती तर त्यांनी रस्ता बांधत असतानाच आक्षेप नोंदवायला हवा होता. रस्ता प्रकल्प सुरू करण्यामागील अधिकृत कारण म्हणजे टिनकर व छांगरू लोक ये-जा करू शकतील. उर्वरित राहिलेला 87 किमी रस्ता पूर्ण करण्यासाठी नेपाळ सैन्याने घाटियाबघर येथे तळ शिबीर तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी