शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:33 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. (CoronaVirus) 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्बात लॅन्सेट कोविड-19 कमिशनकडून एका रिपोर्टमध्ये धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या सुरुवातीच्या समीक्षेनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे रोज 1,750 मृत्यू होऊ शकतात. तसेच ही संख्या वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet)

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. 

असिम्पटोमॅटिक प्रकरण वाढवतायत महामारी -पहिल्या लाटेच्यातुलनेत दुसरी लाट ही दोन महत्वाच्या गोष्टींनी वेगळी आहे. एक म्हणजे, कोरोना रुग्णांच्या वाढत्या ताज्या आकडेवारीचा दर फार अधिक आहे. फेब्रुवारीपासून रोज येणारे 10,000 रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत 80,000 होण्यात 40 दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी 83 दिवसांचा होता. दोन म्हणजे, कोरोना व्हायरसचे रुग्ण असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे आहेत. यामुळे, रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू दर तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

ट्रान्समिशन चेन तोडणे आवश्यक -आर्थिक दृष्ट्या भारताला टेस्टिंगवर 7.8 बिलियन डॉलर्सहून अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. रिपोर्टनुसार, अर्थव्यवस्था आणि लोकांची रोजी-रोटी कमितकमी प्रभावित होईल या दृष्टीने, ट्रान्समिशन चेन तोडण्यासाठी आणि नावा संक्रमण दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. एवढेच नाही, तर लसीकरणाची गती वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.  

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

कठोर उपाय वेळेची आवश्यकता -या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'गेल्या वर्षापासून आपल्याला धडा मिळाला आहे, की भारतात आणि इतर देशांत प्रबळ राजकीय इच्छाशक्ती चांगले परिणाम देऊ शकते. आपल्याला विश्वास आहे, की आता भारताने उचललेले ठोस पाऊल भारताला दुसऱ्या लाटेतून सावरेल, तसेच कोविड-19 संक्रमणाच्या अतिरिक्त लाटेलाही रोखेल. याशिवाय, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचेही लसिकरण करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत