शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

CoronaVirus: ...तर देशात जूनपर्यंत कोरोनामुळे रोज एवढ्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता; लॅन्सेटनं वर्तवला धक्कादायक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:33 IST

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. (CoronaVirus) 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी तत्काळ योग्य प्रयत्न करण्यात आले नाही, तर, भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासंदर्बात लॅन्सेट कोविड-19 कमिशनकडून एका रिपोर्टमध्ये धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या रिपोर्टच्या सुरुवातीच्या समीक्षेनुसार, भारतात कोरोना व्हायरसमुळे रोज 1,750 मृत्यू होऊ शकतात. तसेच ही संख्या वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर पोहोचू शकते, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. (India may witness these daily coronavirus deaths by june first week lancet)

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

महाराष्ट्र, छत्तीसगढ़, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात, हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य आहेत. 'भारतातील दुसऱ्या कोविड-19 लाटेचे नियंत्रण,' असा या रिपोर्टचा मथळा आहे. 

असिम्पटोमॅटिक प्रकरण वाढवतायत महामारी -पहिल्या लाटेच्यातुलनेत दुसरी लाट ही दोन महत्वाच्या गोष्टींनी वेगळी आहे. एक म्हणजे, कोरोना रुग्णांच्या वाढत्या ताज्या आकडेवारीचा दर फार अधिक आहे. फेब्रुवारीपासून रोज येणारे 10,000 रुग्ण वाढून एप्रिलपर्यंत 80,000 होण्यात 40 दिवसांपेक्षाही कमी कालावधी लागला. तर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा कालावधी 83 दिवसांचा होता. दोन म्हणजे, कोरोना व्हायरसचे रुग्ण असिम्टोमॅटिक अथवा हलके लक्षण असणारे आहेत. यामुळे, रुग्णालयात भरती होणे आणि मृत्यू दर तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. 

CoronaVirus : भयावह...! धक्कादायक...! भोपाळमध्ये एकाच वेळी 112 जणांवर अंत्यसंस्कार, पण सरकारी रेकॉर्डवर फक्त चार जण

ट्रान्समिशन चेन तोडणे आवश्यक -आर्थिक दृष्ट्या भारताला टेस्टिंगवर 7.8 बिलियन डॉलर्सहून अधिक पैसे खर्च करावे लागू शकतात. रिपोर्टनुसार, अर्थव्यवस्था आणि लोकांची रोजी-रोटी कमितकमी प्रभावित होईल या दृष्टीने, ट्रान्समिशन चेन तोडण्यासाठी आणि नावा संक्रमण दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. एवढेच नाही, तर लसीकरणाची गती वाढविणे अत्यंत महत्वाचे आहे, असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.  

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

कठोर उपाय वेळेची आवश्यकता -या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की 'गेल्या वर्षापासून आपल्याला धडा मिळाला आहे, की भारतात आणि इतर देशांत प्रबळ राजकीय इच्छाशक्ती चांगले परिणाम देऊ शकते. आपल्याला विश्वास आहे, की आता भारताने उचललेले ठोस पाऊल भारताला दुसऱ्या लाटेतून सावरेल, तसेच कोविड-19 संक्रमणाच्या अतिरिक्त लाटेलाही रोखेल. याशिवाय, कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी, 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचेही लसिकरण करण्याचा सल्ला या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत