शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 02:08 IST

"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे."

मी अनेक वेळा मुस्लिमांसोबत संवाद साधतो, ख्रिश्चनांसोबत संवाद साधतो. आपणही हिंदूच आहात, असे म्हटल्यावर ते म्हणतात. नाही-नाही आम्ही हिंदू नाही. ठीक आहे, मग कोण आहात? हिंदवी आहोत. एकच गोष्ट आहे. लोक मला सल्ला देतात की आपण भारतीय म्हणत जा. समानार्थी शब्द आहे. कुणी भारतीय म्हणत असेल, हिंदवी म्हणत असेल, आम्ही सहमत आहोत. दोन्ही समान शब्द आहेत. पण 'हिंदवी' आणि 'भारतीय' होणे म्हणजे काय? केवळ या देशाचे नागरीक होणे नाही. भारताचा एक स्वभाव आहे. भारत भूगोलाचे नाव नाही, ते स्वभावाचे नाव आहे, हे जोडून ठेवणारा आपला स्वभाव पुन्हा निर्माण करणे आणि निस्वार्थ बुद्दीने, प्रामाणिकपणे सर्वांनी मिळून शिस्तबद्धपद्धतीने देश मोठा करणे. कारण आपला देश मोठा झाल्याने जग मोठे होईल आणि सर्वात प्राचिन असल्याने, आपले चरित्र असे असायला हवे की, दुसऱ्या देशातील लोक आपले चरित्र पाहून आपल्या जीवनाची विद्या शिकतील. उदाहरणांतून लोकांना शिकवणे. आपल्याला जगाची महाशक्ती बनायचे नाही. तर विश्व गुरू बनायचे आहे. असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत "आरएसएसचा १०० वर्षांचा प्रवास: नवीन क्षितिज" या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भागवत यांनी भारतीय समाजाच्या स्वभावासंदर्भात बोलताना हिंदूंच्या चार प्रकारांवरही भाष्य केले. 

भागवत म्हणाले, "असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे. आता पुन्हा ती वेळ आली आहे. अनेक प्रकारचे प्रयोग करत आता जग अडखळत आहे. त्यांना अर्थ काम आणि मोक्षही माहीत आहे. मात्र, अर्थ-काम साधत मोक्षापर्यंत घेऊन जाणारा धर्म त्यांना माहीत नाही. त्यांना रिलिजन माहीत आहे. धर्म माहीत नाही. धर्म आणि रिलिजन वेगळी आहे. त्यांना व्यक्ती हीत, समाजहित, पर्यावरण माहीत आहे. पण व्यक्तीची उन्नती, समाजाचा विकास आणि पर्यावरणणाची हाणीही होऊ नये, हे सर्व एकाचवेळी कसे करायचे? त्यांना परमेष्टी माहीत नाही. ही जी जोडणारी  गोष्ट आहे, तिच्या आधारे आपला देश वैभव संपन्न, सामर्थ संपन्न आणि सर्व हितकारी स्वरूप उभे करणे, तरच जगाला आजच्या समस्येचे पूर्ण उत्तर मिळेल, अर्धवट असलेले जग पूर्ण होईल."

चार प्रकारचे हिंदू कोण? -भागवत पुढे म्हणाले, "भारतीय समाजाच्या स्वभावासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, भारतातील मुस्लीम आणि ख्रीश्चन, हे इतर देशातील मुस्लीम आणि ख्रिश्ननांप्रमाणे नाहीत. त्यांचे वेगळेपण कुठूण आले? ते भारतीय आहे." भागवत पुढे म्हणाले, "यामुळेच तर आम्ही म्हणतो, की चार प्रकारचे हिंदू आहेत. आणखी तर कुणी नाहीत. एक आहेत, 'गर्व सें कहों हम हिंदू है.' दुसरे आहेत, आहोत आम्ही हिंदू आणि राहूत, गर्व वैगेरे कशाला, असतात लोक, आम्हीही आहोत, राहू. तिसरे आहे. 'जोरसे मत बोलो हम हिंदू है,' घरात येऊन विचाराल तर सांगू, बाहेर सांगणार नाही, आहेत त्यांची काही कारणं. आणि चौथे म्हणजे, जे विसरले आहेत. ज्यांना, विसर पाडला गेला, त्यांनी विस्मृतीतच रहावे, अशी व्यवस्था असते. तसे करणारे लोक असतात. आणखी लोकांनी विसरावे आणि तिकडे सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

"कारण भारत मोठा झाला, तर जगातील काही स्वार्थी शक्तींच्या स्वार्थाचे दुकान बंद हईल. यामुळे सर्व जण आपल्याशी मैत्रीही करत आहेत आणि वेळो वेळी शत्रूत्वही दाखवतात. या सर्वांचा उपाय म्हणजे सामर्थसंपन्न राष्ट्र. त्यासाठी संघटित, गुणवान समाज असावा लागतो," असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले."

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : India is a nature, not geography: Mohan Bhagwat on Hindus

Web Summary : Mohan Bhagwat defines India by its inherent nature, not geography. He categorizes Hindus into four types: proud, ambivalent, hesitant, and forgetful. He emphasized unity for a strong, virtuous nation, essential for global well-being, aiming for a world guru status, not just power.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चा