शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

सुरक्षेसाठी योग्य कारवाईचा भारताला पूर्णपणे अधिकार- संरक्षणमंत्री राजनाथसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 1:58 AM

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला.

मॉस्को : चीननेभारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रयत्न करून दोन्ही देशांत झालेल्या करारांचा भंग केला आहे. त्यामुळे चीनने आपले सैन्य पूर्णपणे माघारी न्यावे असे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी निक्षून सांगितले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी उचित कारवाई करणे हा आमचा हक्क आहे असा इशाराही त्यांनी चीनला दिला आहे. तर आम्ही एकही इंच भूमी सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे.

लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले. त्या घटनेपासून भारत व चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या समस्येवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह व चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे यांच्यात शुक्रवारी मॉस्को येथे सुमारे अडीच तास चर्चा झाली. पण चीनने अडेलतट्टूपणाची भूमिका कायम ठेवल्याने या चचेर्तून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या बैठकीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंघे तसेच इतर देशांचे नेतेही रशियाच्या दौºयावर आले आहेत.या बैठकीनंतर चीनने एका पत्रकात म्हटले आहे की, सीमेवरील तणावास संपूर्णपणे भारतच जबाबदार आहे. आमच्या हक्काची एक इंचही जमीन आम्ही सोडणार नाही अशी दर्पोक्ती चीनने केली आहे असे चीनने म्हटले आहे. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात भारताने म्हटले आहे की, सीमेवर चीनने आक्रमक भूमिका घेत अनेक हालचाली सुरू आहेत. या गोष्टींमुळे दोन्ही देशांतील करारांचा चीनने भंग केला आहे.चीनकडून भारतीयांचे अपहरणअरुणाचल प्रदेशलगतच्या सीमाभागातील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या पाच भारतीय नागरिकांचे चिनी लष्कराने अपहरण केल्याची चर्चा आहे. ही घटना या राज्यातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील नाचो भागामध्ये शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतchinaचीन