शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

भारताला १९४७ साली भीक मिळाली, खरे स्वातंत्र्य मिळाले २०१४ साली; कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 06:56 IST

अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : आपल्याला १९४७ जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होती. भारताला खरे स्वातंत्र्य २०१४ साली (भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर) मिळाले, असे वक्तव्य केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर सर्व बाजूंनी टीका सुरू झाली आहे. तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले. त्यावर मुलाखतकर्त्या महिलेने म्हणून तर लोक तुम्हाला भगवान मानतात, असे उद्गार काढल्याने लोकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. तिचे हे वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

चारच दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या कंगनाने आजपर्यंत अशीच अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. देशाला १९४७ जे मिळाले ती भीक होती, असे म्हणणे म्हणजे सर्व स्वातंत्र्यसेनानींचा आणि स्वातंत्र्य लढ्याचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे तर असे वक्तव्य केल्याबद्दल कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणीही काहींनी केली आहे. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी केेलेला त्याग व बलिदान याला भीक म्हणणे हा त्यांचाच नव्हे, तर तमाम भारतीयांचा अपमान आहे, असेही काहींचे म्हणणे आहे.

मुंबई पोलिसांत तक्रार 

काँग्रेस, भाजप, अकाली दर, कम्युनिस्ट अशा सर्व पक्षांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आम आदमी पार्टीने मुंबईत पोलिसांकडे तक्रार केली असून, कंगनाच्या वक्तव्याबद्दल तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी केला निषेध

कंगना रणौतच्या या वक्तव्याचा भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, कधी महात्मा गांधी यांचा त्याग व तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा अपमान. याला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?

अकाली दल म्हणते ही मानसिक दिवाळखोरी

अकाली दलाचे वरिष्ठ नेते मनजिंदर सिरसा म्हणाले की, राणी लक्ष्मीबाईंची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने स्वातंत्र्याला भीक म्हणजे हे तिच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतIndiaभारतBJPभाजपा