शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

'आम्हाला तुमचं मीठही नको आणि ...'; भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:13 IST

India Pakistan Tension : भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे.

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. यातच आता भारतानेपाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी सैंधव मिठाच्या ऑर्डर्स रद्द केल्या असून, नव्या ऑर्डर देणे देखील बंद केले आहे.

चेंबर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन मंत्री अशोक लालवाणी यांनी माहिती देताना म्हटले की, "पाकिस्तानातून सैंधव मीठ, खजूर, काळे मनुके आणि सब्जा आयात करण्यात येत होते. तर, अंजीर आणि मनुका अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते."

भारतात मोठा व्यापार या वस्तूंचा भारतात मोठा व्यापार आहे. दर महिन्याला २५०-३०० टन सैंधव मीठ, ५५०-६०० टन खजूर, १५ टन पिस्ता, काळे मनुके आणि सब्जाचा व्यापार होतो. मात्र, पाकिस्तानातून आयात बंद केल्याने आता घाऊक विक्रेत्यांनी सैंधव मीठाच्या मोठ्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत. तर, विक्रेत्यांनी नव्या ऑर्डर स्वीकारणे देखील बंद केले आहे. 

आग्रा किराणा, रंग आणि केमिकल कमिटीचे सदस्य पवनदीप कपूर यांनी म्हटले की, "आग्र्यात सुक्यामेव्याचे ३० घाऊक व्यापारी आहेत. आमच्या इथे मनुका, पिस्ता, अंजीर हे अफगाणिस्तानातून आयात होत असले, तरी ते पाकिस्तानमार्गे येतात.आग्र्यात २५-३० टन अंजीर, ४०-५० टन मनुक्यांचा व्यापार आहे. आता दुसऱ्या देशाच्या मार्गे यांची आयात होईल. मात्र, यामुळे खर्च वाढणार असून, याचा प्रभाव किंमतींवर पडणार आहे. मात्र, देशाच्या हितासाठी संपूर्ण व्यापारी वर्ग सरकारच्या या निर्णयात साथ देणार आहे."

सुती कपड्यांच्या किमतींवर पडणार प्रभावआग्रा व्यापार मंडळाच्या अध्यक्ष टीएन अग्रवाल म्हणाले की, "पाकिस्तानमधून आयात थांबावल्यामुळे सुती कपड्यांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. सुती कपड्यांची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. या कापडापासून शर्ट, धोतर, अंतरवस्त्रे बनवले जातात. अशा परिस्थितीत सुती कपड्यांच्या किंमती देखील वाढू शकतात. यामुळे भारतीयांना थोडा त्रास होईल. मात्र, पाकिस्तानला यामुळे मोठे नुकसान होणार आहे."

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला