शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

'आम्हाला तुमचं मीठही नको आणि ...'; भारताने पाकिस्तानला दिला आणखी एक मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:51 IST

India Pakistan Tension : भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे.

पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. यातच आता भारतानेपाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारने आता पाकिस्तानाहून होणाऱ्या आयातीवर देखील बंदी घातली आहे. याचा सर्वाधिक प्रभाव सैंधव मीठ आणि सुकामेवा व्यापार क्षेत्रावर पडणार आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी सैंधव मिठाच्या ऑर्डर्स रद्द केल्या असून, नव्या ऑर्डर देणे देखील बंद केले आहे.

चेंबर ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असोसिएशन मंत्री अशोक लालवाणी यांनी माहिती देताना म्हटले की, "पाकिस्तानातून सैंधव मीठ, खजूर, काळे मनुके आणि सब्जा आयात करण्यात येत होते. तर, अंजीर आणि मनुका अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचत होते."

भारतात मोठा व्यापार या वस्तूंचा भारतात मोठा व्यापार आहे. दर महिन्याला २५०-३०० टन सैंधव मीठ, ५५०-६०० टन खजूर, १५ टन पिस्ता, काळे मनुके आणि सब्जाचा व्यापार होतो. मात्र, पाकिस्तानातून आयात बंद केल्याने आता घाऊक विक्रेत्यांनी सैंधव मीठाच्या मोठ्या ऑर्डर्स रद्द केल्या आहेत. तर, विक्रेत्यांनी नव्या ऑर्डर स्वीकारणे देखील बंद केले आहे. 

आग्रा किराणा, रंग आणि केमिकल कमिटीचे सदस्य पवनदीप कपूर यांनी म्हटले की, "आग्र्यात सुक्यामेव्याचे ३० घाऊक व्यापारी आहेत. आमच्या इथे मनुका, पिस्ता, अंजीर हे अफगाणिस्तानातून आयात होत असले, तरी ते पाकिस्तानमार्गे येतात.आग्र्यात २५-३० टन अंजीर, ४०-५० टन मनुक्यांचा व्यापार आहे. आता दुसऱ्या देशाच्या मार्गे यांची आयात होईल. मात्र, यामुळे खर्च वाढणार असून, याचा प्रभाव किंमतींवर पडणार आहे. मात्र, देशाच्या हितासाठी संपूर्ण व्यापारी वर्ग सरकारच्या या निर्णयात साथ देणार आहे."

सुती कपड्यांच्या किमतींवर पडणार प्रभावआग्रा व्यापार मंडळाच्या अध्यक्ष टीएन अग्रवाल म्हणाले की, "पाकिस्तानमधून आयात थांबावल्यामुळे सुती कपड्यांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. सुती कपड्यांची मागणी सध्या चांगलीच वाढली आहे. या कापडापासून शर्ट, धोतर, अंतरवस्त्रे बनवले जातात. अशा परिस्थितीत सुती कपड्यांच्या किंमती देखील वाढू शकतात. यामुळे भारतीयांना थोडा त्रास होईल. मात्र, पाकिस्तानला यामुळे मोठे नुकसान होऊ शकते."

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला