शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

अरबी समुद्रात पाकिस्तान नौदलाचा युद्ध सराव; काही अघटित घडल्यास भारत उत्तर देण्यास सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:49 AM

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे.

नवी दिल्ली - अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून युद्ध सराव सुरु आहे. मात्र पाकिस्तानच्या युद्ध सरावावर भारताने करडी नजर ठेवली आहे. पुढील काही पाकिस्तानी नौदल अरबी समुद्रात रॉकेट आणि मिसाइल फायरिंग करत युद्ध सराव करणार आहे. पाकिस्तानच्या युद्धासरावामुळे भारताने सतर्क राहण्याची भूमिका घेतली आहे. भारताने काही युद्धनौका, पाणबुडी, पेट्रोलिंग करणारी विमाने यांच्यासह काही लढाऊ विमानंही याठिकाणी तैनात केली आहेत. 

जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील नेते एकमेकांविरोधात युद्धाची भाषा बोलू लागलेत. तसेच अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी दोन्ही देशांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या या युद्ध सरावाने भारत सतर्क झाला आहे. 

सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पाकिस्ताच्या युद्ध सरावावर भारताने लक्ष ठेवलं होतं. जर युद्धसरावाच्या आडून पाकिस्तानने नापाक हरकत केली तर भारतीय नौदल आणि जवान सशस्त्र तैनात ठेवण्यात आले आहेत. कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानकडून आणि त्यांच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानचा युद्धसराव नेहमीप्रमाणे होत असला तरी अचानक त्यांचे उदिष्ट बदलू शकते असा दावा केला जात आहे. 

29 सप्टेंबरपर्यंत चालणार पाकिस्तानचा युद्धसरावपाकिस्तानने अरबी समुद्राच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मालवाहू जहाजांना मेरिटाइम अलर्ट जारी केला आहे. 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत लाइव्ह मिसाइल, रॉकेट, बंदूक याचा वापर केला जाणार आहे. जर युद्ध सरावाच्या दरम्यान पाकिस्तानच्या हालचालींवर भारत नजर ठेवणार आहे. जर काही संशयास्पद आढळल्यास भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे. भारतीय नौदल आणि हवाई दल पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. 

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्यानंतर एअरस्ट्राइक करत पाकिस्तानच्या बालकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा बालकोट भागात दहशतवादी तळ सक्रीय झाल्याची माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानindian navyभारतीय नौदल