शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

India China Faceoff : चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 17:24 IST

सतत असे कृत्य करणाऱ्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. दोन्ही देशांमध्ये जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे.

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या हिंसक चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले. यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतत असे कृत्य करणाऱ्या चीनविरोधात भारत सरकारने कडक पावले उचलण्याची आता वेळ आली आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "गलवान खोऱ्यात चिनी सैन्याकडून अशाप्रकारे वारंवार उल्लंघन होत आहे. आता या घुसखोरीला उत्तर देण्याची वेळ आली आहे. आमचे जवान कोणत्याही खेळाचा भाग नाहीत. दर काही दिवसांनी सीमेच्या रक्षणासाठी आपले काही अधिकारी व जवान शहीद होत आहेत."

"भारत सरकारने यावर काही कठोर पावले उचलण्याची आता वेळ आली आहे. आपल्या एक-एक कमजोरीच्या निशाण्यावर चीन अधिकाधिक युद्धप्रिय असल्याचे दाखवतो. मी संपूर्ण देशासह आमच्या शूर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो. आपल्या या दु: खाच्या घटनेत देश आपल्याबरोबर आहे.", असे दुसरे ट्विट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले असून चीनचेही पाच जवान ठार झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांची बैठक बोलावली होती. 

एकीकडे भारत-चीन सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी प्रयत्न करत आहेत. यातच आता दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्यामुळे तणाव आणखीच वाढल्याचे दिसून येते. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय जवानांनी दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच, भारतीय जवानांनी आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : कोरोना संकटापुढे 'गुजरात मॉडेल' फेल - राहुल गांधी

तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत

मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हॉस्पिटलमध्ये दाखल, कोरोना टेस्ट होणार

टॅग्स :Indiaभारतchinaचीनladakhलडाख