India China Faceoff: लडाख सीमेवरच्या हिंसक झटापटीनंतर चीन म्हणतो, आम्हाला आणखी संघर्ष नकोय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 02:57 PM2020-06-17T14:57:17+5:302020-06-17T15:10:01+5:30

India China Faceoff: दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे.

India China Faceoff: we dont wish to see more clashes after violen.t face off with indian soldiers in ladakh says china | India China Faceoff: लडाख सीमेवरच्या हिंसक झटापटीनंतर चीन म्हणतो, आम्हाला आणखी संघर्ष नकोय

India China Faceoff: लडाख सीमेवरच्या हिंसक झटापटीनंतर चीन म्हणतो, आम्हाला आणखी संघर्ष नकोय

Next

नवी दिल्लीः लडाख येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे. सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री रात्री दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला. तर चीनला सीमेवर आणखी संघर्ष नको आहे. दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. या चकमकीसाठी चीनला दोष देऊ नका आणि सीमेवरची एकंदर परिस्थिती स्थिर व नियंत्रित आहे, असा पुनरुच्चार चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केला.

लडाखमधील ही हिंसक चकमक तेव्हा सुरू झाली जेव्हा भारतीय जवान भारतीय हद्दीत चिनी सैन्याने उभारलेले तंबू काढण्यासाठी गेले. ६ जून रोजी दोन्ही बाजूंच्या लेफ्टनंट जनरल-रँक अधिका-यांमध्ये चर्चा झाल्यानंतर चीनने तंबू हटविण्यास सहमती दर्शविली. चिनी सैन्याने भारतीय कर्नल बीएल संतोष बाबूला लक्ष्य केले आणि दांडे, दगड आणि रॉडचा जोरदार वापर करत भारतीय जवानांवर हल्ला केला आहे. भारतीय जवानांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

 भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात येणार आहे. चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते.  हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले. तर अनेक जवान जखमी झाले. ज्या ठिकाणावर ही चकमक झाली त्याच्या खालून श्योक नदी वाहते. अनेक सैनिक या नदीत वाहून गेल्याचेही वृत्त आहे. भारताने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा

India China Faceoff: भारत-चीन सैन्यातील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

India China Faceoff: मोदीजी बाहेर या, कुठे लपून बसला आहात?, राहुल गांधींचा हल्लाबोल

CoronaVirus News : आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

CoronaVirus News: "अखेर सत्य पुढे आलेच"; कोरोनाबळींचा आकडा वाढला, फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला!

CoronaVirus: डॉक्टरांच्या लढ्याला मोठं यश! 'या' औषधानं व्हेंटिलेटरवरचे रुग्णही झाले ठणठणीत

India China Faceoff : मोदी सरकारनं चीनचा बदला घ्यावा, जवान शहीद झाल्यानं ओवैसी संतप्त

दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

Web Title: India China Faceoff: we dont wish to see more clashes after violen.t face off with indian soldiers in ladakh says china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन