शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

India China FaceOff: शहीद सैनिकांच्या बलिदानाचा 'असा' बदला घेणार; चीनविरोधात भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:38 AM

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली - लडाखच्या गलवान सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाले. चीनच्या अशाप्रकारे भारताला धोका दिल्यानं संपूर्ण देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. भारताने अद्यापही या प्रकरणी थेट प्रतिक्रिया दिली नाही. पण देशाच्या शहीदांचे बलिदान व्यर्थ न जाण्यासाठी चीनचा बदला घेण्याची तयारी सुरु केली आहे. पेइचिंगच्या या करकुतीविरोधात भारत मोठ्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

१९७५ नंतर भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष अत्यंत गंभीरस्थितीत येऊन पोहचला आहे. चीनच्या विश्वासघाताविरोधात भारताने चीनविरोधात रणनीती आखली आहे. भारत सैन्यापेक्षा चीनला आर्थिक आघाडीवर घेरण्याच्या तयारीत आहेत. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेतून चीनच्या आर्थिक नाड्या तोडण्याची तयारी भारताने केली आहे. त्यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांमधील वाढता तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकारने चीनला घेरण्याची तयारी केली आहे. संयुक्त राष्ट्र संघातही चीनला धडा शिकवण्याच्या मानसिकता भारताने केली आहे. आतापर्यंत चीनच्या गुंतवणुकदारांना भारतात सहज परवानगी मिळत होती, त्याचा वेग आता कमी केला जाईल. चीनी कंपन्यांना सरकारी अथवा खासगी क्षेत्रात अडचणी निर्माण करण्यात येतील. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीनची मोठी मोबाईल कंपनी हुवेईला भारतात ५ जी मार्केटमध्ये प्रवेश मिळणं जवळपास कठीण झालं आहे.

असा झाला चीन आणि भारत यांच्यात संघर्ष? 

सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली.  

 

टॅग्स :Indiaभारतchinaचीन