शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:46 IST

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले.

ठळक मुद्देलडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते.यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते.लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 76 जवान जखमी झाले होते.

नवी दिल्ली : लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीननेभारताच्या दोन मेजरसह 10 जवानांना बंदी बनवले होते. आता या जवानांना तीन दिवसांच्या बोलणीनंतर सोडण्यात आले आहे. मात्र अद्याप, यासंदर्भात लष्कराने अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते, की याकारवाईत कुठलाही भारतीय जवान बेपत्ता झालेला नाही.

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले.

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

गलवानमधील झटापटीत 76 जवान जखमी -लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 76 जवान जखमी झाले होते. यापैकी 18 जवान गंभीररित्या जखमी झाले. लेह येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर 58 जवानांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

भारतीय आणि चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल-स्तरावरील बैठक पार पडली. यात, झालेल्या चकमकीबोरबरच गलवान खोऱ्याच्या जवळपासचा प्रदेशातील शांततेसंदर्भातही चर्चा झाली. येथे भारत आणि चिनी सैन्य 5 मेपासून समोरासमोर आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट -5 मेरोजी भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट झाली होती. यानंतर भारतीय लष्कराने, पेंगाँग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलतबेग ओल्डीतील सर्व वादग्रस्त भागांतून चिनी सैनिकांना मागे रेटण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत, निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात दोन्ही देशांत अनेकदा चर्चा झाल्या मात्र, त्याचा परिणाम आला नाही.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

15 जूनच्या रात्री हिंसक झटापट -15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. 

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकladakhलडाख