शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

India China Face Off: गलवान हिंसक झटापट; 3 दिवसांनंतर चीनने 2 मेजरसह 10 भारतीय जवानांना सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 11:46 IST

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले.

ठळक मुद्देलडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते.यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते.लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 76 जवान जखमी झाले होते.

नवी दिल्ली : लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत चिनी सेनिकांनी भारताच्या 10 जवानांना बंदी बनवले होते. पीटीआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीननेभारताच्या दोन मेजरसह 10 जवानांना बंदी बनवले होते. आता या जवानांना तीन दिवसांच्या बोलणीनंतर सोडण्यात आले आहे. मात्र अद्याप, यासंदर्भात लष्कराने अधिकृत माहिती दिलेली नाही. लष्कराने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते, की याकारवाईत कुठलाही भारतीय जवान बेपत्ता झालेला नाही.

यापूर्वी जुलै, 1962मध्ये चिनी सैनिकांनी भारतीय जवानांना बंदी बनवले होते. गलवान घाटीतील युद्धाच्यावेळी भारताचे जवळपास 30 जवान धारातिर्थी पडले होते, तर बऱ्याच जवानांना चिनी सैन्याने पकडले होते. त्यांना नंतर सोडण्यात आले.

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

गलवानमधील झटापटीत 76 जवान जखमी -लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 76 जवान जखमी झाले होते. यापैकी 18 जवान गंभीररित्या जखमी झाले. लेह येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर 58 जवानांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

भारतीय आणि चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांत गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी मेजर जनरल-स्तरावरील बैठक पार पडली. यात, झालेल्या चकमकीबोरबरच गलवान खोऱ्याच्या जवळपासचा प्रदेशातील शांततेसंदर्भातही चर्चा झाली. येथे भारत आणि चिनी सैन्य 5 मेपासून समोरासमोर आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट -5 मेरोजी भारत आणि चिनी सैन्याची पेंगाँग त्सोमध्येही झटापट झाली होती. यानंतर भारतीय लष्कराने, पेंगाँग त्सो, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलतबेग ओल्डीतील सर्व वादग्रस्त भागांतून चिनी सैनिकांना मागे रेटण्यासंदर्भात पावले उचलण्याबाबत, निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात दोन्ही देशांत अनेकदा चर्चा झाल्या मात्र, त्याचा परिणाम आला नाही.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

15 जूनच्या रात्री हिंसक झटापट -15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. 

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकladakhलडाख